अचानक झालेल्या हल्ल्यानं दलपत बिथरला. पण लगेच सावरत त्यानं प्रतिकार केला. दलपतनं आरडाओरडा केल्यानं चोरानं पळ काढला आणि दलपत बचावला.
जोधपूरमधली ही कहाणी सविस्तर सांगण्याचा उद्देश तुम्हाला सावध करणं हा आहे. कारण असे प्रकार याआधीही घडले आहेत. कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतात. त्यामुळे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.
एटीएममधून पैसे काढताना ही काळजी घ्या!
- शक्यतो शुकशुकाट असलेल्या ठिकाणी आणि अवेळी पैसे काढू नयेत
- गजबजलेल्या आणि भरपूर उजेड असलेलं एटीएम निवडावं
- शक्यतो सुरक्षारक्षक असलेल्या एटीएममधूनच पैसे काढावेत
- ज्या ठिकाणी दरवाजा लॉक होतो असं एटीएम निवडावं
- पैसे काढताना रक्कम कुणाला दिसणार नाही अशी काढावी
- पैसे काढण्याआधीच कुणी आत येत असल्यास मज्जाव करावा
- एटीएममधून बाहेर पडताना पैसे मोजत बाहेर पडू नये
- मोठी रक्कम असल्यास कुणाला तरी एटीएमला सोबत न्यावं
खरं तर याआधीही बंगलोरमधल्या एटीएममध्ये झालेल्या या हल्ल्यानं एटीएमचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पण बँकांनी यातून धडा घेतलेला दिसत नाही. कारण सुरक्षेच्या नावाखाली एटीएममध्ये सीसीटीव्ही व्यतिरिक्त काहीच नाही
झटपट पैसा कमवण्यासाठी कुणीही कोणत्याही थराला जाऊ शकतं. पण त्यांच्या या अघोरी मार्गात एखाद्या निष्पापाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे बँकांनी एटीएम सक्षम आणि सुरक्षित करण्याची गरज आहे. तर लोकांनी एटीएममधून पैसे काढताना, जरा अधिक सावध राहण्याची गरज आहे.