कोल्हापूरहून बंगलोरकडे मालवाहू ट्रक जेसीबी घेऊन निघाला होता. भुतरामहट्टी येथे ट्रक आल्यावर इंजिनमधून धूर येत असल्याचे चालकाच्या ध्यानात आले. लगेच चालक आणि क्लिनर ट्रकमधून खाली उतरले. इंजिनमधून धूर आल्यावर काही वेळाने आग लागली. इंजिनला लागलेली आग पसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दल दाखल झाले आणि त्यांनी त्वरित आग विझवली.
ट्रकला आग लागल्याची घटना कळताच काकती पोलीस लगेच दाखल झाले आणि त्यांनी वाहतुकीवर नियंत्रण ठेवले. महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाल्यामुळे एका बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.