रुळ ओलांडताना रेल्वेची धडक, सहा जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2016 08:23 AM (IST)
पाटणा : बिहारच्या दरभंगामध्ये छठ पर्वाच्या समारोप उत्सवावर शोककळा पसरली. छठ पूजेहून परतताना महिला भाविकांना अपघात झाला. रामभद्रपूर स्टेशनजवळ रेल्वे रुळ ओलांडताना सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या महिला मुलांसह छठ पूजा करुन परतत होत्या. मात्र रामभद्रपूर स्टेशनजवळ स्वतंत्रता सेनानी ट्रेनने धडक दिल्याने दोन मुलं आणि चार महिलांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिक संतप्त झाले आहे. मृतदेह रेल्वे रुळवर ठेवून नागरिक रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहेत. याशिवाय दरभंगा-समस्तीपूर यादरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.