स्थानिकांनीच हस्तक्षेप करत दंगलखोरांपासून पर्यटकांची सुखरुप सुटका केली. नाशिकमधून एकूण 140 लोक काश्मीरमध्ये गेले आहेत. सध्या तिन्ही वाहनं आणि लोक अनंतनाग इथं पोहोचले असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येते आहे.
काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात काल हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा बुरहान वानीला ठार केलं गेलं. तेव्हापासून काश्मीर खोरं अशांत बनलं आहे. मुजाहिद्दीनचा काश्मीर खोऱ्यातला पोस्टर बॉय, अशी बुरहानची ओळख होती. बुरहान वानीचा खात्मा हे भारतीय जवानांच्या दृष्टीनं मोठं यश आहे.