मुंबई : 2016-17 हे आर्थिक वर्ष संपून आजपासून म्हणजे 1 एप्रिलपासून 2017-18 या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. आजपासून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे. पाहूया आज कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये बदल होणार आहे :

 

 

 

 

 

  • एसबीआयच्या ग्रहकांना आजपासून किमान बॅलन्स ठेवणं बंधनकारक, शहरांमध्ये किमान 5 हजार रुपये, तर ग्रामीण भागात किमान एक हजार रुपयांची मर्यादा


 

  • मोटार गाड्यांवरील थर्ड पार्टी इन्शुरन्सचा हप्ता जवळपास 50 टक्क्यांनी वाढणार आहे. विमा हप्त्याचे नवे दर लागू होतील.


 

  • पीक विमा योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड बंधनकारक


 

  • सेन्सॉर बोर्ड आजपासून ऑनलाईन होणार, आता सिनेनिर्माते बोर्डाच्या वेबसाईटवरच संबंधित पेपर जमा करु शकतात


 

  • दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, कोची आणि अहमदाबाद विमानतळांवर आजपासून प्रवाशांच्या हँडबॅगवर सुरक्षा टॅग लावलं जाणार नाही.


 

  • स्मार्ट फोन, पान-मसाला, सिगरेट, चांदीचे दागिने, कार, मोटरसायकल महाग


 

  • नैसर्गिक गॅस, रेल्वे तिकीट, आरओ, पीओएस मशिन, चामड्याच्या वस्तू स्वस्त