Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत सभापतीपदावरून एनडीए आणि इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये शाब्दिक हल्ले सुरुच आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या टीडीपीला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले आहेत. दुसरीकडे JDU ने आपले इरादे स्पष्ट केले आहेत.


जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी त्यागी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, "काँग्रेस जे काही करत आहे ते लक्ष विचलित करत आहे, ते चुकीचे आहे. कारण परंपरा अशी आहे की सत्ताधारी आघाडीतील सर्वात मोठा पक्षच स्पीकरबाबत निर्णय घेतो. भाजप कोणताही निर्णय घेईल, आम्ही त्याचे समर्थन करू.


सभापतीपदावर टीडीपीची भूमिका काय?


लोकसभा अध्यक्षांबद्दल, टीडीपीने म्हटले की सत्ताधारी आघाडीने सभापतीपदासाठी उमेदवार उभा केला पाहिजे. टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभी राम कोमरेड्डी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत एनडीएचे सहयोगी एकत्र बसतील आणि सभापतीपदाचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय घेतील. एकदा एकमत झाले की आम्ही तो उमेदवार उभा करू आणि टीडीपीसह सर्व मित्र पक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील.


भाजपसाठी सभापतीपद का महत्त्वाचे?


तथापि, टीडीपीने सभापतींच्या खुर्चीवर आपला दावा करण्याचा पर्याय नाकारला नाही. अशा स्थितीत जेडीयूच्या भूमिकेमुळे भाजपची स्थिती मजबूत झाली आहे. भाजपच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, पक्षाला सभापतीपद आपल्या उमेदवारासाठी ठेवायचे आहे आणि त्यांनी आपल्या मित्रपक्षांशीही याबाबत चर्चा केली आहे. कारण 1999 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत होते आणि त्या काळात सरकारला विश्वासदर्शक ठरावातून जावे लागले, जे ते संसदेत करू शकले नाही. त्यावेळी टीडीपीचे खासदार जीएमसी बालयोगी स्पीकर होते.


1999 मध्ये काय झाले?


1999 मध्ये, जयललिता यांच्या नेतृत्वाखालील AIADMK ने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार एका मताने पडले. कारण बालयोगी यांनी अध्यक्ष म्हणून ओडिशाचे तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री गिरीधर यांना मतदान केले होते. तीन महिन्यांपूर्वीच ते मुख्यमंत्री झाले होते, मात्र तोपर्यंत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला नव्हता.


एनडीएची संख्या किती?


एनडीए सरकारसाठी टीडीपी आणि जेडीयूचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे, कारण लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत, जे बहुमताच्या 272 च्या आकड्यापेक्षा कमी आहे. याशिवाय टीडीपीला 16, तर जेडीयूला 12 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतरच एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या