जम्मू-काश्मीर : अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 7 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील 2 आणि गुजरातमधील वलसाडचे 5 जणांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी झाले आहेत.


मृतांची नावं :

  1. उषा सोनकर, पालघर, महाराष्ट्र

  2. निर्मलाबेन ठाकोर, पालघर, महाराष्ट्र

  3. रतन पटेल, गुजरात

  4. सुरेखाबेन, वलसाड, गुजरात

  5. लक्ष्मीबेन पटेल, वलसाड, गुजरात

  6. हसूबेन पटेल, वलसाड, गुजरात

  7. प्रजापती चंपाबेन, नवसारी, गुजरात


संध्याकाळी सव्वा आठच्या सुमारास बालटाल इथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली. हीच संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला.

दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी 10 वाजता गृहमंत्रालयाची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्रालयाची टीम आज अनंतनागला जाऊन अमरनाथ यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहे.