पुणे:  राष्ट्रीय प्रवेश आणि पात्रता अर्थात नीट परीक्षेविरोधातली सुनावणी उद्या होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातल्या याचिका दाखल करुन घेतल्या. महाराष्ट्रासह  एकूण ८ राज्यांनी या नीट परीक्षेला आणि त्याच्या तात्काळ अंमलबजावणीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कोर्टात नीट परीक्षेचा निकाल काय लागणार, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमधली धाकधूक मात्र कायम आहे.


 

याआधीही सुप्रीम कोर्टानं केंद्रासह पालक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वतंत्र पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत.

 

मेडिकल प्रवेशासाठी संपूर्ण देशात एकच परीक्षा असावी, असा निर्णय कोर्टानं दिला आहे. मात्र, ती परीक्षा यंदापासून लागू करावी, असंही कोर्टानं म्हटल्यानं ऐनवेळेस विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोठी धावपळ होणार आहे.

 

दरम्यान, आजच्या सुनावणीसाठी खुद्द राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे दिल्लीत सुप्रीम कोर्टात हजर होते. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही कोर्टात लढू, असं तावडे म्हणाले. मात्र त्याचवेळी त्यांनी विद्यार्थ्यांना राज्यात 5 मे रोजी होणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करण्याचं आवाहन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही लढू, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

संबंधित बातम्या


 सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?


'नीट'विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार


 त्यापेक्षा अभ्यास करा, 'नीट'बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली


‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश