या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. अपघाताच्या वेळी मोठा आवाज आल्याचं रेल्वेतील प्रवाशांनी म्हटलं आहे.
या घटनेमुळे इतर ट्रेन मेरठ आणि कानपूर मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.