...तर मुंबईहून दिल्ली अवघ्या आठ तासात गाठता येणार!
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2016 02:50 AM (IST)
बरेली: मुंबई ते दिल्ली हे जवळपास 1400 किलोमीटरचं अंतर आता फक्त आठ तासात पार करता येण्याची शक्यता आहे. कारण देशातील पहिल्या हायस्पीड टॅल्गो ट्रेनची चाचणी काल करण्यात आली. बरेली-मुरादाबाद दरम्यान ही चाचणी करण्यात आली आहे. स्पेनच्या टॅल्गो कंपनीनं रेल्वेचे हे डबे तयार केले आहेत. या ट्रेनचा स्पीड तासाला दोनशे किलोमीटर असणार आहे. भारतातील रेल्वे ट्रॅकवर ही ट्रेन यशस्वीरित्या धावली तर मुंबई ते दिल्ली हे अंतर अवघ्या सात ते आठ तासांवर कापता येऊ शकतं. टॅल्गोचा वेग गतिमान एक्स्प्रेसच्या तुलनेत ताशी ४० किमीनं अधिक आहे. वजनानं हलकी असल्यानं टॅल्गो ट्रेनमुळे रेल्वेला विजेची मोठी बचतही अपेक्षित आहे.