Russia-Ukraine war : युक्रेन-रशिया युद्धाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच अॅडव्हायजरी जारी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने तेथे विमाने पाठवली आहेत, पण विमान तेथे उतरू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


भारताला शांतता हवी आहे,
युक्रेनमध्ये  अडकलेल्या विद्यार्थ्यांवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 'केंद्र सरकारने आधीच अॅडव्हायजरी जारी केली आहे. केंद्र सरकारने तिथे विमाने पाठवली आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे विमान तिथे उतरू शकत नाही. सरकार शक्य तितके सातत्याने प्रयत्न करत असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, परिस्थिती विचित्र आहे, यात शंका नाही. भारताला शांतता हवी आहे, ती चर्चेने सोडवली पाहिजे. यासोबतच युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असेही ते म्हणाले.



18,000 भारतीयांना परत आणण्याची तयारी सुरू आहे


भारताचे परराष्ट्र मंत्रालय युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी पावले उचलत आहे. युक्रेनमधील हवाई क्षेत्र बंद असल्याने भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. केंद्र सरकार सर्व भारतीयांच्या सुरक्षेची खात्री करेल. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी ही माहिती दिली आहे.


पीएम मोदींना मदतीचे आवाहन


युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या तणावात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोल्खा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना आवाहन करत त्यांनी याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तात्काळ बोलायला हवे. युक्रेनच्या राजदूताने सांगितले की, राजधानी कीवजवळही हल्ले झाले आहेत. रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे. यावेळी मोदीजी खूप मोठे नेते आहेत, आम्ही त्यांना मदतीचे आवाहन करतो. जगातील तणाव केवळ भारतच कमी करू शकतो. त्यांनी सांगितले की, 5 रशियन विमाने पाडण्यात आली आहेत.


संबंधित बातम्या: