Road Rage Case: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू  (Navjot singh sidhu)  हे आज पटियाला न्यायालयात (Patiala court) हजर राहणार होते. मात्र, प्रकृतीचे कारण सांगून त्यांनी न्यायालयापुढे शरण येण्यासाठी वेळ देण्याची विनंती सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सिद्धू यांनी एक आठवड्याचा वेळ देण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यावर न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांच्या खंडपीठाने मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमण यांना सुनावणीसाठी विनंती केली आहे. सिद्धूचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, सिद्धू यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव शरण येण्यासाठी काही आठवड्यांची विनंती केली आहे.


दरम्यान, सरन्यायाधीशांनी आतापर्यंत कोणत्याही खटल्याचा उल्लेख ऐकून घेण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत या प्रकरणावर 2 वाजता सुनावणी होऊ शकते. पटियाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरिंदर पाल लाली यांनी पक्ष समर्थकांना दिलेल्या संदेशात सांगितले होते की, सिद्धू सकाळी 10 वाजता न्यायालयात पोहोचणार आहेत. पक्षाच्या समर्थकांना सकाळी 9.30 वाजता न्यायालयाच्या आवारात पोहोचण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सिद्धूची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसरहून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पटियालाला पोहोचल्या आहेत. मात्र, अचानक सिद्धू यांनी शरण येण्यास वेळ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता न्यायालय नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विनंतीवर काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.   


प्रकरण नेमकं काय?


27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंगला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. 


महत्वाच्या बातम्या: