गिरीराज सिंह यांनी अब्दुल्ला यांचा समाचार घेताना, 'मक्काच्या ऐवजी हज दुसऱ्या जागी नेले तर चालेल का? राम मंदिर अयोध्येत नाही तर काय मक्का-मदिनामध्ये बांधणार का?' असा सवाल देखील केला.
यावेळी लोकसंख्या नियंत्रणावर देखील गिरीराज सिंह यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, लोकसंख्या नियंत्रण संबंधी कायदा करण्यात यावा. तसेच जो कोणी या कायद्याचे पालन करणार नाही, त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा, अशी तरतूद करण्यात यावी. तसेच देशात अल्पसंख्यांकांची व्याख्याही बदलण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.