डोक्यावर पाणी ओतून झाडांचं महत्त्व सांगणारे मंत्री
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2016 09:19 AM (IST)
नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री अंतरसिंह आर्य यांनी एका अनोख्या पद्धतीने जंगलाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. त्यांनी चक्क आपल्या टक्कलाचे उदाहरण देऊन जंगलाचे महत्त्व सांगितले. मध्यप्रदेशाचे कामगार मंत्री अंतरसिंह आर्य यांनी वन वाचवा, वृक्ष वाचवा अभियानाची सुरुवात करताना, आपल्या डोक्यावर पाणी ओतून घेतले. आणि ज्याप्रमाणे डोक्यावर केस नसल्यास पाणी राहत नाही. त्याप्रमाणेच डोंगरांवर झाडे नसतील, तर चांगला पाऊस होणार नाही, आणि जमिनीत पाणीदेखील मुरणार नाही, असे सांगितले. पहा व्हिडिओ