संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, "पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी जिल्ह्यातील भींबर गली सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या चौकांवर लहान शस्त्र, ऑटोमेटिक आणि मोर्टारचे ग्रेनेड फेकले. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला गेला."
भारतीय सैनिकांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, दोन्हीकडून तुफान गोळीबार सुरुच होता.
मंगळवारी झालेलं शस्त्रसंधीचं उल्लंघन ही गेल्या 24 तासांतील तिसरी घटना होती. याआधी पूँछ जिल्ह्यातील एलओसीवर पाकिस्तानकडून गोळीबार झाला होता.