जम्मू-काश्मीर : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या लढाऊन विमानांनी आज भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत बॉम्ब टाकल्याचं वृत्त मिळत आहे.


जम्मू काश्मीरच्या राजौरी परिसरात किमान तीन विमानं भारतीय हवाई हद्दील आली असल्याची माहिती आहे. मात्र भारतीय वायुसेनेच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला आहे. भारत सरकार किंवा वायुसेनेकडून याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.


व्हिडीओ :