जनतेला संबंधित करताना मोदी म्हणाले की, "हा महामार्ग बनल्यानंतर ज्या ज्या वेळी केदारनाथ आणि बद्रीनाथला याल, त्या त्या वेळी तुम्ही या सरकारची आणि नितीन गडकरींची आठवण काढाल, जशी श्रावणबाळाची काढता."
"सभेला एवढ्या लोकांची हजेरी पाहून असंच वाटतं की उत्तराखंड आता विकासासाठी आणखी प्रतीक्षा करणार नाही. उत्तरखंडमधील महाप्रलयात प्राण गमावलेल्यांना हा महामार्ग समर्पित आहे. या हायवेवर कोणत्याही वातावरणाचा परिणाम होणार नाही. हा ऑल वेदर हायवे प्रोजेक्ट आहे, जो चारधामांना एकमेकांशी जोडेल," असं मोदी म्हणाले.