मथुरा हिंसाचार प्रकरणी ३२० जणांना अटक, भाजपचं आज धरणं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2016 02:39 AM (IST)
मथुरा : उत्तर प्रदेशातील मथूरामध्ये भडकलेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 320 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील मुख्य सुत्रधार रामवृक्ष यादव अजूनही फरार आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजप आज धरणं आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यलयासमोर होणाऱ्या या आंदोलनात मथुरेच्या खासदार हेमामालिनी सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेशमधील अखिलेश सरकार आणि भू-माफियांच्या युतीमुळे हा हिंसाचार भडकल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे याची सीबीआयकडून चौकशी व्हावी ; अशी मागणी त्यांनी केली आहे.