नवी दिल्ली: भारतामध्ये येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाची स्थिती भयानक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकरात लवकर लॉकडाऊन लावणं गरजेचं आहे असं मत डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी व्यक्त केलंय. डॉ. अॅन्थनी फाऊची हे अमेरिकेच्या बायडन प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार आहेत. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.


भारताला कोरोनावर नियंत्रण ठेवायचं असेल तर लवकरात लवकर काही आठवड्यांचे लॉकडाऊन लावणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच हे लॉकडाऊन लावत असतानाच शक्य तितक्या गतीने लसीकरण करणे आवश्यक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. कारण जसजसं लसीकरण वाढत जाईल तसतसं ही लाट कमी येण्याची शक्यता आहे. 


युध्दजन्य स्थिती समजून काम करावं
भारतातील सध्याची परिस्थिती ही युद्धजन्य असल्याचं मानावं आणि लष्कराच्या मदतीने शक्य तितक्या प्रमाणात फिल्ड हॉस्पिटल्स उभी करावीत असाही सल्ला डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी दिला आहे.  


भारतातील कोरोनावर उपाययोजना करताना राष्ट्रीय पातळीवर एक टास्क फोर्स सारखी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचं मत डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे. डॉ. अॅन्थनी फाऊची यांच्या मते, भारतात आता तीन पातळीवर कोरोना विरोधात उपाययोजना करणे आवश्यक आहे. एक म्हणजे तात्काळ काय उपाय करता येतील. दुसरं म्हणजे येत्या एक दोन आठवड्याभरात काय उपाययोजना करता येतील आणि तिसरं म्हणजे दुसऱ्या लाटेचा कालावधी वाढू नये तसेच तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील. 


डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी दिलेल्या सल्ल्यावर मोदी सरकार विचार करणार का हे आता पहावं लागेल.  


महत्वाच्या बातम्या :