Pahalgam Terror Attack LIVE: पहलगाल हल्ल्यात जीव गमावलेल्या संतोष जगदाळे अन् गणबोटे यांचं पार्थिव पुण्यात दाखल
Pahalgam terror attack: भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 28 जण मृत्युमुखी पडले आहेत.
पार्श्वभूमी
भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 26 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून मृतांच्या आकड्यात...More
पाणीटंचाईच्या झळा... लातूर जिल्ह्यातील १३ गावं आणि ५ वाड्यांना २१ अधिग्रहणांद्वारे तर दोन तांड्यांना एका टँकरद्वारे सध्या सुरू आहे पाणीपुरवठा
A/c : लातूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. वाढत्या उन्हाबरोबरच जिल्ह्यातील काही भागात पाणीटंचाईच्या झळा ही तीव्र होत चालल्या आहेत. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने सध्या लातूर जिल्ह्यातील १३ गावे आणि ५ वाड्यांना विहीर आणि बोअरच्या अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा आणि वाघमारी तांडा या तांड्यांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, अशी माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. उन्हाच्या तीव्रतेमुळे खालावत असलेली पाणीपातळी लक्षात घेता येत्या महिन्यात जिल्ह्यात अधिग्रहणांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग
नितेश राणे पत्रकार परिषद मुद्दे
ऑन जम्मू काश्मीर
२०१४ नंतर आतंकवाद असो किंवा पाकिस्तान देशाची प्रतिमा कणखर राहिलेली आहे. हे काय मनमोहन सिंग यांचं सरकार नाही. गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही मोदीजींचं केंद्र सरकार आहे. २०१४ च्या नंतर आपल्या देशाकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलेला आहे.. पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा अबा पण वाकड्या नजरेने बघणार नाही
ऑन पुलवामा
मोदी वर विश्वास ठेवला पाहिजे. मनमोहन सिंग आणि लीचे पीचे काँग्रेस वाल्यांचे सरकार नाही. हे कणखर देशभक्ताचं राष्ट्रभक्ताचं सरकार आहे. त्यामुळे पाकिस्तान परत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करणार नाही.
ऑन संजय राऊत
शेंबड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न विचारता भांडुपच्या देवानंदला देशपातळीचे प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारल्यावर अशीच उत्तर मिळणार त्याचा मालक. ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता त्यावेळी कोरोना काळात महाराष्ट्र एक नंबरला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता का. त्यामुळे कुठल्या तोंडाने अमित शहा यांचा राजीनामा मागतोय.
ऑन चिपी विमानतळ
संदर्भात बॅरिस्टर नाथ पै विमानतळाच्या नावा संदर्भात केंद्र शासनाकडे गेलेला आहे. आता तो अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री कार्यालय स्वतः याचा पाठपुरावा करत आहेत. विमानतळावर नाईट लँडिंग व्हावी यासाठी खासदार नारायण राणे यांनी मी एका महिन्यात तीन बैठका घेतल्या आहेत. आनंदाची बातमी अशी की त्या दिशेने वाटचाल देखील सुरू आहे. नाईट लँडिंग साठी लागणारी वीज सुविधा आहे. त्या सुविधेला जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिला आहे.
ऑन मच्छीमार व्यावसायिकांना कृषी दर्जा
चार लाख ८३ हजार मच्छीमारांचा बांधवांचा दरडोई उत्पन्न वाढावं हे आमचे धोरण आहे. मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देण्यात यावा हा निर्णय घेणारा महाराष्ट्र पहिले राज्य आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना सवलती मिळत आहेत. त्या सवलती आता मच्छीमार बांधवांना मिळणार देशामध्ये मासेमारीमध्ये महाराष्ट्र पहिल्या तीन क्रमांका मध्ये येईल.
ऑन एकनाथ शिंदे;वैभव नाईक ऑफर संदर्भात
तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या दुकानात कुठला माल भरावा हा त्यांचा प्रश्न आहे आहे. उदय सामंत यांनी कोणाला ऑफर द्यावं कोणाला नाही द्यावं हा त्यांचा विषय आहे. त्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचे स्वागत करतो. शिवसेना व भाजप हे एकत्र निवडणूक लढवून जिंकून आलो आहे. त्यामुळे हा कोणा एकाचा बालेकिल्ला होऊ शकत नाही. सिंधुदुर्ग हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या विजयामध्ये भाजपचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा आहे.
साताऱ्यातील दुष्काळी खटाव तालुक्यातील औंधच्या शेतकऱ्याची ढोबळी मिरची रोपांमध्ये फसवणूक – शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान, बोगस रोपवाटिकेविरोधात संताप
सातारा - सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील खटाव तालुक्यात औंध येथील शेतकरी जयवंत जगदाळे यांची ढोबळी मिरचीच्या रोपांमध्ये मोठी फसवणूक झाली आहे.सुमारे ५० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची शेतकऱ्याचे सांगणे आहे. सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडीखण येथील वाघमोडे हायटेक रोपवाटिकेतून घेतलेल्या इंडस ११ आणि प्रोफेसर या वाणांची एकूण ४८ हजार रोपे निकृष्ट आणि बोगस निघाल्याचा आरोप जगदाळे यांनी केला आहे.
विओ 1- जयवंत जगदाळे यांनी डिसेंबर महिन्यात साडेपाच एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली होती. अपेक्षेप्रमाणे ३० दिवसात कळी लागणे आवश्यक होते, मात्र रोपांना सहाव्या दिवशीच कळी लागली, जी नैसर्गिक प्रक्रियेविरोधात होती. त्यानंतर सतत रोपांची वाढ खुंटत गेली. शेतकऱ्यांनी वारंवार रोपवाटिका मालकाशी संपर्क साधून प्लॉट पाहणीची विनंती केली, परंतु मालकाकडून टाळाटाळ झाली.७६ दिवस उलटून गेले तरीही रोपांची वाढ झाली नाही. यामागे रोपवाटिकेने ग्रोथ रेग्युलेटर वापरल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. यासंदर्भात पंचायत समितीकडे तक्रार दाखल केल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी रमेश देशमुख आणि इतर तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन पंचनामा केला आणि नुकसान भरपाईची ग्वाही दिली.मात्र अद्याप या शेतकऱ्याला कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही.
Wkt शेतकरी 121 जयवंत जगदाळे
विओ 2 - शेतकऱ्याने अत्यंत महागडी बियाणं, खत, औषध, मजुरी यावर सुमारे १० लाख रुपयांचे थेट भांडवल खर्च केले. जर रोपे दर्जेदार असती तर एकरी उत्पन्न २५ ते ३० लाख रुपये मिळाले असते. सध्या तरी एकही रुपयाचे उत्पादन नाही या शेतकऱ्याला मिळालेले नाही.त्यामुळे जगदाळे या शेतकऱ्याचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे.
एसटीच्या उत्पन्नाचा आलेख ऐन उन्हाळी हंगामात घसरलेलाच
उदिष्ट साध्य करणारे ३१ पैकी राज्यात फक्त दोनच विभाग!
मुंबई (दि. २४ एप्रिल)
एसटीच्या उत्पन्नाचा आलेख दिवसेंदिवस घसरत चालला असून एप्रिल महिन्यातील भाडेवाढीच्या पटीत उद्दिष्टांच्या प्रमाणे प्रतिदिन सरासरी ३३ कोटी ६५ लाख इतके उत्पन्न मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र २९ कोटी ८० लाख रुपये इतके उत्पन्न प्रतिदिन मिळाले असून ऐन उन्हाळी हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात अपयश आले असून साडे तीन ते चार कोटींनी घट झाली असल्याचे दिसून येत आहे.त्या मुळे कुचकामी ठरलेल्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली नाहीतर डोलारा कोलमडून पडेल अशी भिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी वर्तविली आहे.
एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेही व्हिजन राबविले जात नसून ऐन उन्हाळी हंगामात एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसातील आकडेवारीतून अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात अपयश येत असल्याचे दिसून आले होते.पण त्या नंतरही प्रवासी संख्या व उत्पन्न वाढीसाठी काहीही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. अनेक विभागात प्रवासी संख्या वाढीसाठी संधी उपलब्ध असताना वाहतुकीसी संबंधित विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी निव्वळ दिवस भरताना दिसले.
कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. आढावा घेण्यात आला नाही.परिणाणी उत्पन्न व प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ झाली नाही.१ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत उद्दिष्टा प्रमाणे दिवसाला साधारण तीन ते चार लाखांनी उत्पन्नात घट झाली असून प्रवासी संख्या सुद्धा गत वर्षीच्या तुलनेत दीड लाखाने कमी झाल्याचे दिसून आले आहे. ऐन उन्हाळी हंगामात व भाडेवढी नंतरही उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली असून आता उन्हाळी हंगाम फक्त एक महिना शिल्लक राहिला आहे. या महिन्यात एसटीच्या एकूण ३१ विभागांपैकी फक्त कोल्हापूर व सांगली या दोनच विभागांना अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात यश आले असून आता यापुढे फक्त एक महिना उत्पन्न वाढीची संधी आहे.
उष्णतेचा पारा वाढला असताना सुद्धा जीवाची पर्वा न करता चालक - वाहक व इतर कर्मचारी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत.अधिकारी मात्र अपेक्षित प्रयत्न करताना दिसत नाहीत.त्या मुळे एसटीचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ स्वतः विशेष लक्ष घालून एसटीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा किंबहुना काम चुकार अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून मोठी कारवाई करण्यात आली पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचे अधिकार
भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद , भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार नाही
पाकिस्तानचा भारतीयांचा सार्क व्हिसा रद्द
भारतीय उच्चायुकतालयातील लष्कर सल्लागार पर्सन नॉन ग्राटा , भारतात परत यावे लागणार
वाघा अत्तारी सीमा बंद, इस्लामाबादमधील भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांची संख्या ३० वर आणण्याचा निर्णय
राज्यातील पर्यटकांना घेऊन निघालेले दुसरे विमान जम्मू आणि काश्मीरमधून मुंबईकडे रवाना
राज्यातील 184 पर्यटक मुंबईत सुखरूप परतणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून पर्यटकांना दिला निरोप
श्रीनगर :- जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारे पहिले विमान काल पहाटे साडे तीन वाजता मुंबईत उतरले. तर आज दुपारी दोन वाजता उर्वरित पर्यटकांना घेऊन जाणारे दुसरे विमानही मुंबईकडे मार्गस्थ झाले.
या विमानात एकूण 184 पर्यटक असून त्यांना या विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधून त्याना आशवस्त करून मुंबईकडे रवाना केले. यावेळी या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच आमच्या संकटकाळी आमचा लाडका भाऊ मदतीसाठी धावून आल्याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना त्यांच्याकडे व्यक्त केली.
तसेच तत्पूर्वी शिंदे यांनी या पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्समधून विमानतळाकडे रवाना केले. यावेळी या पर्यटकांचा ताण हलका करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत खास फोटोसेशनही केले. राज्यातील 184 पर्यटकांना घेऊन निघालेले हे विमान आज संध्याकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावरील टर्मिनल-1 येथे पोहोचणार आहे.
हर्षल लेले
बाबाना गोळी डोक्यात मारली तेंव्हा माझा हात डोक्याजवळ होता मला वाटलं कीं माझ्या हाताला गोळी लागली कारण माझा हात रक्ताने माखला होता
तिथे घोडे फक्त जातात बाकी गाड्या जात नाहीत
घोड्यावरून खाली आणायला ३ तास लागतात
आम्ही तसेच चार तास माझ्या आईला उचलून घोड्यावर बसवलं
प्यारेलासिस माझ्या आईला आहे
त्यानंतर तिला खाली आल्यानंतर रुग्णलयात नेलं
मी आणि माझा भाऊ चालत खाली आलो
फायरिंग अडीच वाजता झाली दुपारी आम्ही खाली आलो sade५ सहा वाजता
आम्ही त्या दरम्यान सुन्न होतो
नंतर मला कळलं कीं तीन जणांचा मृत्यू झाला
विरार : विरारमध्ये ह्रदयपिळवटून टाकणारी घटना घडली आहे. २१ व्या मजल्यावरून खाली पडल्याने सात महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार २३ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास विरार पश्चिमेकडील जॉय विला कॉम्प्लेक्समधील पिनॅकल सोसायटीत घडली आहे.
विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य पिनॅकल सोसायटीमधील २१ व्या मजल्यावर राहत होते. त्यांचा सात महिन्यांचा मुलगा व्रिशांक उर्फ वेद याला झोप येत नव्हती, म्हणून पूजा सेदानी त्याला कुशीत घेऊन मास्टर बेडरुममध्ये फिरत होत्या. बेडरुममध्ये हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली होती. मात्र, अचानक फरशी ओलसर असल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट बाल्कनीच्या दिशेने पडल्या. या झटक्यात त्यांच्या कुशीत असलेला व्रिशांक हा बाल्कनीतून थेट खाली पडला.
तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सेदानी कुटुंबाला सात वर्षांनंतर मूल झाले होते, त्यामुळे हा अपघात त्यांच्या आयुष्यावर काळा ठसा उमटवणारा ठरला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सोसायटीत हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक पोलीस तपास करत असून, सदर घटना ही अपघाती असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे.
ही घटना पालकांनी लहान मुलांची काळजी घेताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करते.
श्रीनगरमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर
काश्मीरमधून आणखी १८४ पर्यटक महाराष्ट्रात सुखरुप परतणार
दुपारी दोन वाजता श्रीनगरहून विशेष विमानाने सर्व पर्यटक महाराष्ट्रात परतणार
पर्यटकांचे दुसरे विशेष विमान मुंबईतील सांताक्रूझ टर्मिनल १ वर संध्याकाळी ५.०० वाजता येणार
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या टीमकडून श्रीनगरमध्ये मदतकार्य सुरु
नाशिकच्या कारचालकाचा मुजोरीचा प्रताप आला।समोर
- सिग्नलचे नियम पाळणाऱ्या दुचाकीस्वरांना बेदरकारपणे गाडी चालवून धडक देत खाली चिरडण्याचा प्रयत्न
- कार चालकांसाठी सिग्नल तोडून।रस्ता मोकळा केला।नसल्यानं पाठलाग करून अंगावर गाडी घालत जिवे मारण्याचा प्रयत्न
सुरवातीला जोरजोरात हॉर्न वाजबून दुचाकी स्वरांना बाजूला करण्याचा प्रयत्न मात्र ते बाजूला झाले नसल्यानं ।3 वेळा दिली धडक
- नाशिकच्या त्र्यंबकरोडवरील धक्कादायक घटना
- घटनेत दोन्ही तरुण गंभीर जखमी, तर कारचालक शाहरुख शेख झाला होता फरार..
- सापळा रचून शाहरुख फारुक शेख या कारचालकाला पोलिसांनी केली अटक
घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर, दुचाकी स्वराच्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेरात थरार कैद
कारेगाव पारधी बेड्यावर प्रशासनाचा पाण्याचा टँकर पोहोचला... फक्त एका टँकरने पाण्याची समस्या सुटेल का??
यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव पारधी बेड्यावर धोकादायक विहिरीतून महिला जीव मुठीत धरून कशा पद्धतीने मानवी साखळी तयार करून पाणी भरतात, याचा दुर्दैवी वास्तव एबीपी माझा ने समोर आणला होता...
नंतर यवतमाळ मधील प्रशासनाला जाग आली असून कारेगाव पारधी बेड्यावर टॅंकरने पाणी पाठवण्यात आले आहे.
नुकतंच यवतमाळ जिल्हा परिषदेच्या एका पथकाने कारेगाव पारधी बेड्यावर भेट देत धोकादायक विहिरीची पाहणी तर केलीच.. सोबतच बेड्यावरील लोकांशी बोलून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या... त्यानंतर पारधी बेड्यावर टँकर पाठवून पाण्याची तात्पुरती सोय करण्यात आली...
दरम्यान कारेगाव या पारधी बेड्यावर अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे.. त्यामुळे प्रशासनाने आजवर दुर्लक्ष का केले?? आणि फक्त एक टँकर पाठवून ही समस्या दूर होईल का?? असा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे...
काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज दोन विशेष विमाने मुंबईत येणार
इंडिगोचे विमान सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल
एअर इंडियाचे विमान ८३ पर्यटकांना सायंकाळी ६.३० वाजता परत आणेल
असे महाराष्ट्रातील एकूण १८३ पर्यटक आज मुंबईत परततील
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत
या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार
छत्तीसगडमध्ये चकमकीत पाच नक्षलवादी ठार
तीन राज्याच्या 20 हजार सुरक्षा दलाच्या जवानांनी 1 हजार नक्षलवाद्यांना घेरले
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या कॅरेगुट्टा जंगल भागात सुरक्षा दलाची नक्षलविरोधी मोठी कारवाई
आतापर्यंत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले
घटनास्थळी सुमारे 1 हजार नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती
मोस्ट वॉन्टेड नक्षल कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा याच्यासह प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या हालचाली बद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाची कारवाई
जिल्हा राखीव रक्षक दल, बस्तर फायटर्स, विशेष टास्क फोर्स, राज्य पोलिसांच्या तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोब्रा बटालियन यांची संयुक्त कामगिरी
कालपासून चकमक सुरू असून नडपल्ली पहाडीतून सतत गोळीबाराचा आवाज
ड्रोन च्या मदतीने सुरक्षा दलाची आहे चकमकी वर नजर
झेलम चौबळ , केसरी टूर TT
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनावर परिणाम झालाय. मात्र याचा परिणाम पर्यटन कंपनीवरदेखील झालाय.
केसरी टूरकडून काश्मीरला गेलेले साधारण २०० लोक आता तिकडे आहेत. मात्र पुढील तीन महिन्यात ३००० जणांनी काश्मीरच बुकिंग केलंय.
हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांना धास्ती बसल्याने १० टक्के लोकांनी बुकिंग कॅन्सल केलंय.
३० तारखेपर्यंत असलेल्या बुकिंगच्या विमान तिकिटांच पूर्ण रिफंड मिळणार आहे. मात्र ज्यांना ट्रिप कॅन्सल करायचंय त्यांना पुन्हा ट्रिप प्लान करुन देत आहोत.
काश्मिर आता कुठे सगळं नीट होत आलेलं मात्र पुन्हा काश्मिरमध्ये भितीच वातावरण निर्माण झाल आहे
जंगलाच्या जिल्ह्याचे तापमान पोहोचले 44.6 अंशावर
तीन दशकानंतर दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद
76 टक्के जंगल क्षेत्र तरीही वाढतोय तापमान
गडचिरोली : जगात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील जिल्ह्यात होत असताना राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही बुधवारी धक्कादायक 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 1992 म्हणजे तब्बल तीन दशकानंतर गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. गडचिरोलीकरांसाठी ही एक प्रकारे धोक्याची घंटा मानली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात किती आहे वनक्षेत्र आणि यापूर्वी जिल्ह्यामध्ये किती नोंदवले गेले होते तापमान... पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून...
ग्राफिक्स इन
गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ 14 हजार 412 चौरस किलोमीटर आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 76 टक्के वनक्षेत्र आहे.
2011 च्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार, गडचिरोली जिल्ह्यात 10 हजार 94 चौरस किलोमीटर जंगल क्षेत्र होते.
2019 च्या रिपोर्टनुसार गडचिरोली जिल्ह्यात एकूण 9 हजार 916.94 चौरस किलोमीटर जंगल आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक तापमान 20 मे 1992 रोजी 46.3 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.
23 एप्रिल 2025 रोजी 44.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
5 जानेवारी 1992 रोजी सर्वात कमी 5.0 डी.से. एवढे तापमान नोंदवले गेले आहे.
नागपुरातील तिलक रूपचंदानी आणि त्यांची पत्नी सिमरन रुपचंदानी काल रात्री मुंबई आणि आज पहाटे ते नागपुरात दाखल झाले आहे..
जेव्हा पहलगाम मध्ये बैसरन व्हॅली मध्ये दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा रुपचंदानी कुटुंबीय बैसरन व्हॅली मधून काही क्षण आधीच बाहेर निघाले होते...
लोखंडी दाराच्या जवळून ते बाहेर निघताना पाठीमागून गोळ्यांचा आवाज येऊ लागला, तेव्हा तिघे समोरच्या दिशेने धावू लागले, त्या धावपळीत सिमरन रूपचंदानी यांचा उंची वरून पाय घसरला आणि पायात इजा होऊन त्या जखमी झाल्या.. त्यानंतर ही भीतीपायी सतत चालत राहिल्यामुळे पुढे काही किलोमीटर पायी चालताना त्यांच्या पायात फ्रॅक्चर झाले...
अशा स्थितीत सिमरन यांना त्यांचे पती आणि 17 वर्षीय मुलाने आधार देऊन अनेक किलोमीटर पर्यंत आणले..
नंतर स्थानिक डॉक्टरांकडून प्रथमोपचार केल्यानंतर रूपचंदानी कुटुंबीय श्रीनगरला परत आले...
तिलक रुपचंदानी यांचा दावा आहे की त्यावेळेस बैसरन व्हॅलीमध्ये त्यांनी किमान 100 गोळ्यांचा आवाज आणि लोकांच्या किंकाळया ऐकल्या.. लोक बेधुंद होऊन जीव वाचवण्यासाठी धावत होते आणि त्यामध्ये सिमरन रूपचंदानी यांच्यासारखे अनेक लोक उंचावरून किंवा चिखलात पाय घसरल्यामुळे जखमी झाले...
ब्रेक
अतुल मोने यांच्या जागी त्यांच्या पत्नीला मध्य रेल्वेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू
मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार
अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉप मध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर या पदावर काम करत होते, 2000 मध्ये ते ज्युनियर इंजिनियर पदावर मध्य रेल्वेत रुजू झाले होते
कामावर अतिशय मनमिळावू आणि सर्वांना सामावून घेत काम करणाऱ्या अतुल मोने यांचा दहशतवादी हल्ल्यात 22 तारखेला मृत्यू झाला
त्यामुळे त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या बायकोला, अनुष्का मोने यांना मध्य रेल्वेत नोकरी दिली जाणार, ग्रुप C मध्ये ही नोकरी असेल, त्यांचे एम ए पर्यंत शिक्षण झालेले असल्याची माहिती, त्यानुसार त्यांना विभाग दिला जाणार,
त्याचसोबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून देखील आर्थिक मदत जाहीर होण्याची शक्यता
मध्य रेल्वे सूत्रांची माहिती
प्रतापराव जाधव यांचा पुढकार : ४७ पर्यटक भुसावळ-मलकापूरला परतणार
बुलढाणा : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेत केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय साधत ४७ जणांच्या सुरक्षित स्थलांतराची विशेष रेल्वे व्यवस्था उभी केली आहे.
जाधव गुरुवारी सकाळी स्वत: श्रीनगरमध्ये दाखल होऊन अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. २४ एप्रिल रोजी पहाटेच्या रेल्वेद्वारे या पर्यटकांना जम्मू येथून भुसावळ व मलकापूर येथे पोहोचविण्यात येणार आहे.
या पर्यटकांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव, शेगाव तालुक्यातील अनेकजण असून, राज्यातील इतर भागांतील २० जणांचा देखील समावेश आहे.
त्यात संजीव, भारती, प्रणव, प्राशु, अनुज, सुप्रिया, आदित्य पुरवार, संदीप, वर्षा, सुपेश, सर्वेश खेडकर, आशिष, दीपाली जैन, अमोल, आरती, श्रेया, देवांश पांढरे, सुरेश, शितल हिंगणे, श्रीकांत, उज्वला, स्वराज महल्ले, विशाल, गंगा धांडे, गजानन, प्रिया, सुयोग काळे, ज्ञानेश्वर, वर्षा इंगळे, निखीलेश, कोमल, ईशानवी बेलोकार, योगेश, श्रद्धा हिरडकर, विष्णू पिवळटकार, मेधा सपकाळ, मंगेश, गोकुळ, अन्वी, मल्हार वैतकार, संजय चौधरी, देव, नारायणी पाटील, शिवम कंडेलवार, मोहन, पुनम, आराध्या दळवी यांचा समावेश आहे.
२४ एप्रिल सायंकाळी किंवा २५ सकाळपर्यंत हे सर्व पर्यटक भुसावळ-मलकापूर स्थानकांवर पोहोचणार आहेत.
दहशतीच्या छायेतून हे सर्वजण सुखरूप परत येत असल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
डोंबिवली मध्ये भाजपाचे रस्त्यावरती उतरून निदर्शने.
काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंद,
नरेंद्र मोदी ला तुम्ही हलक्यात घेऊ नका काही दिवसातच तुमचे डोळे पांढरे होतील असा पाकिस्तानला दिला इशारा,
दुकान बंद करण्यासाठी हजारो महिला पुरुष भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उतरले रस्त्यावर,
रस्त्यावरती उतरून भाजपा कार्यकर्त्यांनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी..
सुरू असलेली दुकाने केली बंद
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. त्यांनी पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. भारताने पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंटवर बंदी घातली आहे. बुधवारी संध्याकाळी झालेल्या सीसीएस बैठकीत भारताने यापूर्वी पाच मोठे निर्णय घेतले होते. यामध्ये अटारी सीमा बंद करणे देखील समाविष्ट होते. आता भारताने सोशल मीडियाबाबत मोठी कारवाई केली आहे.
ढिल्ली ते वारला साडेतीन किलोमीटर असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट... हाताने उकरला जातोय सिमेंट रस्ता...
वाशिम तालुक्यातील ढिल्ली ते बेडा फाटा या साडेतीन किलोमीटर असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाच होत असल्याने, शासनाचे लाख रुपये पाण्यात जात असल्याचा प्रकार गावकऱ्यांनी उघड केला आहे. हा रस्ता हाताने उकरला जात असून, या रस्त्यात सिमेंटचा पत्ताच नसल्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाच होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचं काम करण्यात येतय, सध्या हे काम ढिल्ली पासून बेडा फाट्यापर्यंत झाल आहे. ५ कोटी१४ लाख रुपयांच हे काम असून, काम निकृष्ट दर्जाच होत असल्यामुळे शासनाच्या लाख रुपयांच्या निधीचं वाट्टोळ होत असल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम बंद करून नव्याने रस्ता।तयार करून कंत्राटदारावर कारवाई ची मागणी गावातील नागरिकांनी केलीय
सात जण सुखरूप
अँकर :- सातारा जिल्ह्यातील सात पर्यटक काश्मीर श्रीनगर येथे अडकले असून ते आज जम्मूला ट्रीप वरून परतणार होते. मात्र दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीहून जम्मूला गाड्या जात नसल्याची माहिती सातारा जिल्ह्यातील पर्यटक महेश कुलकर्णी यांनी दिली असून ते पुढील दोन दिवसानंतर सातारा जिल्ह्यात परतणार असल्याचे माहिती दिली आहे.
आम्ही सगळ्या महिलांनी तिथं मोठमोठ्यांनी अजान म्हटलं
कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला आहे. संतोष जगदाळे यांचा परिवार आणि आम्ही सोबत होतो. ते कुराणवरून काहीतरी झालं. आम्ही सगळ्या महिलांनी तिथं मोठमोठ्यांनी अजान म्हटलं. मारणारे चार जण होते. तिथे एक जण मुस्लीम घोडेवाला होता, त्याने त्यांना विचारलं या निष्पाप लोकांना का मारत आहात त्यांनी काय चुकी केली आहे. त्यानंतर त्याला कपडे काढून गोळ्या झाडल्या. तो मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, दहशतवाद्यांनी त्यालाही कपडे काढून त्याला गोळ्या मारल्या. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
नागपूरातील भंसाली कुटुंबीय आणि कोलकर कुटुंबीय आज सकाळीच श्रीनगरवरुन नागपुरात परतले. सरकारची मदत होतेय, मात्र हल्ल्यानंतर श्रीनगर मध्ये कर्फ्यू आहे संपूर्णतः बाजारपेठ बंद आहे. हल्ल्याच्या वेळेस बरेच महाराष्ट्रीयन पहलगाम येथे होते. काश्मिरात सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्रीयन पाहायला मिळत होते असे स्वाती कोलकर यांनी सांगितले
हल्ल्याच्या दिवशी आम्ही पहलगाम भागात होतो. सकाळी 11 वाजता पहलगाम मधून निघालो त्यानंतर दुपारच्या दहशlवादी हल्ला झाला. आम्ही परत येत असतांना टॅक्सी चालकांना फोन आला होता, मात्र त्यांनी आम्हला काहीच सांगितले नाही. रस्त्यात केसर घ्यायला थांबलो असतांना दुकानदार देखील तिथल्या परिस्थितीची चौकशी करत होते. त्यांना दहशदवादी हल्ला झाला हे माहीत असतांना आम्हाला सांगत नव्हते.
आम्ही श्रीनगरला हॉटेल पोहचलो त्यानंतर आम्हाला दहशदवादी हल्ल्याबद्दल कळल्याचे स्वाती कोलकर यांनी सांगितले. त्यांनतर आम्ही कधी नागपूरला परत जातो असेच वाटत होते. आज सकाळी नागपूरला पोहचलो तेव्हा आम्ही सुटकेचा श्वास घेतल्याचे कोलकर कुटुंबीयांनी सांगितले
डोंबिवली शहरात कडकडीत बंद असून देखील काही ठिकाणी दुकानात सुरू असल्याने ठाकरे गट रस्त्यावर. ठाकरे गटाकडून सर्वांना दुकान बंद करण्याचे आव्हान केले जात आहे. तसेच रिक्षा चालक मालक संघटनाना देखील रिक्षा बंद करण्याचे सांगण्यात आले. डोंबिवली स्टेशन परिसरात अनेक दुकाने बंद करण्यात आली
काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान 83 पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने 100, असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.
संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात. नागरिकांकडून 'पाकिस्तान जला दो', 'पाकिस्तान जला दो'च्या घोषणा. वैकुंठ स्मशानभूमीबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराची कारवाई सुरु...1500 हून अधिक लोकांना ताब्यात घेऊन चौकशी... संशयित दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्रे जारी... २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका...सिंधू जल करार स्थगित, अटारी बॉर्डर बंद करण्याचाही निर्णय, पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश. सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानचा संताप, हल्ल्याशी संबंध नाही, भारताचा निर्णय अयोग्य, उपपंतप्रधान इशाक दार यांची प्रतिक्रिया
भारतातील ५ लाखांहून अधिक मशिदींमधून दहशतवादविरोधी संदेश देणार, ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांची घोषणा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचे शरद पवार यांनी कर्वेनगरमधील त्यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले. यावेळी शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीशी संवाद साधला आणि त्यांचे सांत्वन केले.
काश्मीरच्या पहलगामजवळील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅली येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना हॉटेलमध्ये थांबविण्यात आले आहे. विमान व रेल्वेच्या तिकीट बुकिंगनुसार पर्यटकांना सोडले जात आहे. काश्मीरला महाराष्ट्र आणि गुजरातमधून सर्वाधिक पर्यटक भेट देतात. सध्या तेथे दोन्ही राज्यांतील सुमारे २० हजार पर्यटक असल्याची माहिती महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनने (एमटीओए) ‘लोकमत’ला दिली.
श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग या भागात पर्यटक विशेषत: भेट देतात. हल्ल्यानंतर आता वातावरण निवळत आहे. दोन-तीन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरला गेल्याने सध्या तेथे व्हीआयपी मूव्हमेंट सुरू असल्याचे ‘एमटीओए’चे अध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी सांगितले. एप्रिल-मे हा तेथील पर्यटनाचा हंगाम असल्याने देशभरातील लाखो पर्यटक सध्या तेथे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे जगदाळे यांच्या पुण्यातील घरी जाणार आहेत. शरद पवार याठिकाणी जाऊन जगदाळे कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत.
केंद्र सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक.. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या, कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्णयांची देणार माहिती...
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी राज्य सरकारडून विशेष विमानाची व्यवस्था...खर्च सरकारच करणार...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्री गिरीश महाजनही काश्मीरमध्ये दाखल
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले डोंबिवलीकर मोने, जोशी आणि लेले यांच्या पार्थिवावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, तर देसलेंना अखेरचा निरोप देताना पनवेलकर भावूक. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली, परभणी आणि मालेगावात आज बंदची हाक..बंदमध्ये सहभागी होण्याचं स्थानिकांना आवाहन
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जाणार आहे. यासाठी सकाळी दहा वाजता निषेध मोर्चा शिवसेना भवन येथून काढला जाणार आहे. यामध्ये स्थानिक आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई मोर्चात सहभागी असतील.
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तान प्रणित अतिरेक्यांकडून हिंदु पर्यटकांवर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा निषेध आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदु बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध करत या घटने संदर्भात आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत तसेच जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर आता पूर्णविराम लावावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव पुण्यातील घरी आणण्यात आलं आहे. संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि वृद्ध आईला अश्रू अनावर.
पुणे एअरपोर्टवर गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहचल्या आहेत. मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित. दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक आलेले आहेत एअरपोर्टवर. गणबोटे यांच्या पत्नी , मुलगा आणि इतर नातेवाईक दुसऱ्या विमानाने पुणे एअरपोर्टला पोहचले आहेत. यानंतर ते आपल्या निवासस्थानी गेले.
विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर
तीन पोलीस अधीकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी
दोषी पोलीसांवर दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई
एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, तीन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या 15 व 16 मार्च रोजीच्या बारामती दौऱ्यादरम्यान गंभीर स्वरुपाच्या सुरक्षा विषयक त्रुटींसंदर्भात चौकशीअंती कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोषी पोलीसांना दोन हजार रुपये दंड बजावण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना चौकशी करुन वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार चौकशी करण्यात येऊन प्राप्त अहवालाचे अवलोकन केले असता मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या दिनांक 15 व 16 मार्च रोजीच्या बारामती, जिल्हा पुणे येथील दौऱ्या दरम्यान सुरक्षा व राजशिष्टाचार विषयक गंभीर त्रुटी आढळून आल्या. 1) श्री.प्रवीण बाळासाहेब मोरे, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण 2) श्री.रविंद्र कोळी, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण 3) श्रीमती वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे यांचेकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्या कार्यालयास प्राप्त झाला. त्यानुसार कसूर केलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 1) श्रीमती सुवर्णा गायकवाड, परिविक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे 2) श्री.शामराव यशवंत गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण 3) श्री.रोहित दिलीप वायकर, पोलीस शिपाई पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण 4) श्रीमती सारिका दादासाहेब बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण 5) श्री.वसंत सखाराम वाघोले, सहाय्यक फौजदार, पुणे ग्रामीण यांनी देखील कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडून त्यांना दंडनीय कारणे दाखवा नोटीस पाठवून खातेनिहाय चौकशीची कारवाई करण्यात येत आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात आज 45.5 अंश तापमानाची नोंद तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी शहरात 45.6 अंश तापमानाची नोंद... जिल्ह्याचं तापमान एकीकडे 46 अंशांच्या घरात पोहोचलं असतानाच दुसरीकडे मात्र चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यात काही भागात वादळी पावसासह गारपीट, वादळाने काही घरांवरील छते उडाली असून झाडं देखील कोसळली, या पावसामुळे मक्का, भाजीपाला, मिरची पिकाला फटका बसण्याची शक्यता, यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या गोंडपिपरी भागातील नागरिकांना मिळाला काहीसा दिलासा
पहलगाम दहशतवादी हल्ला
मुंब्र्यात दहशतवाद्यांच्या पुतळ्याला दिली फाशी
दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आदरांजली
Anchor: - काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली.
काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंब्रा - अमृतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच, दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली.
या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी, आज भारतातील कोणताच नागरिक सुरक्षित राहिलेला नाही. येथे मृत्यू स्वस्त झाले आहेत. आपण आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटनास जाऊ शकत नाही. ही शोकांतिका असून त्यास सुरक्षा यंत्रणेतील फोलपणा कारणीभूत आहे. सर्वात दुर्देवी म्हणजे, दहशतवादी हल्ल्यात हिंदू, मुस्लीम धर्मियांसह अन्य धर्मिय लोकही मारले गेले आहेत. तरीही, गुन्हेगाराला शोधण्याऐवजी धर्म शोधला जात आहे, हे अतिशय वाईट आहे. हिंदू धर्म ज्या प्रमाणे झुंडशाहीला मान्यता देत नाही. त्याचप्रमाणे इस्लामदेखील कोणाचे प्राण घ्यायला परवानगी देत नाही. अन् असे कृत्य करणाऱ्यास घरात घुसून मारले पाहिजे. आज या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने सत्ताधारी विधाने करीत आहेत. त्याकडे पाहता, सत्ताधाऱ्यांना देशभर दंगे भडकावयाचे आहेत, असेच चित्र दिसत आहे. त्याचा निषेध तर आम्ही करतोच पण जे कोणी या हल्ल्याच्या मागे आहेत. त्यांनाही फाशी दिले पाहिजे, अशी मागणी केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करुन साकारणार टाऊनहॉल जिमखाना इमारत
शासकीय पुढाकारातून मुंबईत प्रथमच साकारणार नगर सभागृह अर्थात नागरी संवादासाठी हक्काची जागा
पुरातन वारसा परिसराला साजेसे बांधकाम व वास्तूरचना, नगर सभागृह, काचेचा घुमट, व्हिविंग गॅलरी, काचेची कॅप्सूल लिफ्ट, रूफ टॉप कॅफेटेरिया, वाहनतळ इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह संपूर्ण पुरातन वारसा परिसर न्याहाळण्याची पर्यंटकांसह सर्वांना मिळणार संधी
जास्तीत जास्त महानगरपालिका कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा यासाठी महालक्ष्मी रेसकोर्सजवळील तुळशीवाडीमध्ये सुसज्ज व अत्याधुनिक महानगरपालिका क्रीडाभवन साकारण्याचे प्रस्तावित
चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री,भाजप प्रदेशाध्यक्ष
- संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची घेतली आहे, मी विदर्भ, नागपूर आणि अमरावती या भागातली माहिती घेतली आहे
- जे 26 लोक त्या ठिकाणी ठार झाले त्यापैकी सहा लोक महाराष्ट्रातील आहेत, आणि हा भ्याड हल्ला धर्म विचारून केला गेला आहे, खरंतर हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं आहे आणि अशा प्रकारची घटना कश्मीरमध्ये होणे म्हणजे या ठिकाणी डिवाइड करण्याचा फार्मूल आतंकवादी आणि मास्टर माईंडनी केला आहे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी,कणखर गृहमंत्री अमित शहा ज्या कुटुंबातील जीव गेला आहे त्यांच्या पाठीशी उभे आहेत, आम्ही पाठीशी उभे आहोत, जे या घटनेमध्ये मास्टर माईंड असतील किंवा जे आतंकवादी यांना आमचे सरकार शोधून काढेल आणि त्यांना मोठी शिक्षा आमचे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही
- या घटनेत राजकारण करण्याची गरज नाही, काही लोकांना दिवसभर राजकारण करायचा आहे म्हणून दिवसभर राजकारणावर बोलतात, अशा घटनेत संपूर्ण देश पाठीशी उभा करून एकसंघपणे सरकारच्या मागे उभं राहून या देशाला मजबूत केलं पाहिजे, महाराष्ट्राला मजबूत केलं पाहिजे
- ज्यांचे जीव गेले आहेत त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, या घटनेचा राजकारण करून काही लोक पोळी शिजवण्याचा प्रयत्न करतात ते योग्य नाही
- मी अमरावती आणि नागपूर मधील अडकलेले पर्यटकांना फोन केले आहेत, त्यांची मागणी आहे की लवकर परत आणावे, गिरीश महाजन तिकडे गेले आहेत, सरकार आमचं पोहोचला आहे, आमच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी सर्व व्यवस्था करतो आहे
- हे संताप जनक घटना आहे, ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये पर्यटक जायला लागले होते, 370 कलम हटल्या नंतर लोकांमध्ये उत्साह तयार झाला होता, दीड कोटी पर्यटक चालले होते हे दहशतवाद्यांना उध्वस्त करायचं होतं
- यापेक्षाही दहा पट जास्त ताकद केंद्र सरकार लावेल, ज्याप्रमाणे 370 कलम हटवल्यानंतर वातावरण तयार झालं होतं त्याला पुन्हा गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला, यामध्ये प्रधानमंत्री आणि अमित शहा अजून चांगलं कश्मीर चांगलं करण्याचा प्रयत्न करतील
पहलगाम हल्ला: मृत पर्यटकांच्या नातेवाईकांशी, अडकलेल्या पर्यटकांसाठी आणि राज्य प्रशासनाशी महाराष्ट्र सदन सतत संपर्कात
नवी दिल्ली, 23 : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महाराष्ट्रीयन पर्यटकांच्या पार्थिवांची सुखरूप व्यवस्था आणि जखमींच्या मदतीसाठी, महाराष्ट्र सदन सक्रियपणे कार्यरत आहे. जम्मू-कश्मीर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी चार पार्थिव मुंबईला, तर दोन पार्थिव पुण्याला दिल्लीमार्गे पाठवण्यात येणार आहेत. पार्थिवांबरोबर असलेल्या नातेवाईकांशी महाराष्ट्र सदन येथील राजशिष्टाचार विभागातील अधिकारी सतत संपर्कात आहेत.
या हल्ल्यात जखमी झालेले चार पर्यटक सुखरूप असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे. तसेच, जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 308 पर्यटकांशी संपर्क साधला गेला आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून या पर्यटकांच्या निवास आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, सर्वोतोपरी मदत आणि समन्वयासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.
काश्मिर मध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दिलीप देसले यांचे पार्थिव आज त्यांच्या राहत्या घरी 5.30 वाजेपर्यंत नविन पनवेल येथे आणणार आहे. देसेले यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावला असुन, देसले यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया देण्याची परिस्थती नाही. संपुर्ण परिसरात सध्या भावनिक वातावरण असुन स्मशान शांतता आहे. थोड्या वेळात देसले यांचे पार्थिव हे निवास्थानी येउन नंतर पोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आरोपीच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ
आरोपी मनीषा माने हिला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली
कोर्टाच्या सुनावणीत आज तपाससतील अनेक मुद्दे पोलिसांनी न्यायालयात मांडले
यामध्ये प्रामुख्याने हॉस्पिटलमधील तब्बल 27 कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषा माने हिच्या विरोधात तक्रार दिल्याची पोलिसांची माहिती
या 27 तक्रारींची सखोल तपासणी करण्यासाठी आरोपीची कोठडी गरजेचे असल्याचे सरकारी पक्षाचा युक्तिवाद
तसेच आरोपी मनीषा मुसळे-माने तपासात सहकार्य करत नसल्याचा ही पोलिसांनी केला न्यायालयात दावा
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात कोठडीसाठी सांगितलेले बहुतांश कारणे जुनीच असल्याने नव्याने कोठडी देऊ नये, आरोपी मनीषा माने हिच्या वकिलांचा युक्तिवाद
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायादांडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपी मनीषा माने हिला दोन दिवसांची वाढीव कोठडी सुनवली
बाईट - ऍड. प्रशांत नवगिरे, आरोपी मनीषा माने हिचे वकील
उकाड्याने परभणीकर त्रस्त
मागच्या काही दिवसांपासुन पासून परभणी शहरासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे.आज यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आलीय.आज जिल्ह्याचे तापमान हे 43.01 अंशावर पोचले आहे.ज्यामुळे जनजीवना वर परिणाम झाला असुन दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून,अनेकजण घरीच थांबणे पसंत करत आहेत.महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणारे नागरिक रुमाल,टोपी छत्री आदींचा उपयोग करताना दिसत आहेत
हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी देखील उष्णतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Pune - अकलूज जवळच्या कोंडबावी गावातील काही गावगुंडांनी दुकानातील उधारी का मागितली असा सवाल करीत हवेत गोळीबार करून किरणा दुकानाची आणि काही मोटारसायकलींची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मकोका अंतर्गत दाखल गुन्हयात जामिनावर असलेल्या आबा वाघमारे व चिरंजीव वाघमारे याने हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. सुमारे 30 ते 40 गावगुंडांच्या जमावाने येथील बापू घाडगे यांना व त्यांच्या मुलास बेदम मारहाण करत त्यांच्या किराणा दुकानची मोडतोड केली आहे. या गावगुंडांनी काही मोटारसायकलींची तोडफोड केली आहे. सध्या गावात तणाव असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र केवळ उधारी मागितली म्हणून अशा पद्धतीच्या गुंडगिरीमुळे ग्रामीण भागातही कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्याचे दिसत आहे
एबीपी माझाच्या बातमीनंतर माढा तालुक्यातील पिंपळनेर परिसरात असणारे आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या 47 पर्यटकांना सोडवण्यासाठी माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधत त्यांना परत आणण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली.यावेळी आमदार अभिजीत पाटील यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांना व्हिडिओ कॉल लावून दिला आणि त्यांच्या अडचणी मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवल्या
वर्तकनगर येथील आरक्षण केंद्र लवकरात लवकर सुरू करा
दिघा येथील धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करा
खासदार नरेश म्हस्के यांची रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक संपन्न
Anchor - ठाणे आणि नवी मुंबई विभागीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि मागण्यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांची आज बुधवार, 23 एप्रिल रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील स्थानके आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे महाव्यवस्थापकांनी समस्यांवर तोडगा काढण्याचे तसेच लवकरच स्थानकांचा पाहणी दौरा करणार असल्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, मा. नगरसेवक रमाकांत म्हात्रे, शिवराम पाटील, मा. नगरसेवक विजयानंद माने, शहर संघटक नंदा काटे, बाळा गवस, जयेश जाधव, अजित दुबे (रेल्वे कमिटी सदस्य) आदी उपस्थित होते.
ठाणे रेल्वे स्थानकातील समस्यांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. वर्तकनगर येथील आरक्षण खिडकी लवकरात लवकर सुरू करण्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी निर्देश दिले.
नवी मुंबई शहारातील रेल्वे स्थानकांतील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. सदरच्या बैठकीमध्ये दिघा, भोलानगर, अनंत नगर रेल्वे खालून गणपती पाडा येथे राहणाऱ्या रहिवाश्यांकरिता जाण्या-येण्याकरिता अंडरपास बनवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. दिघा येथे असलेले पाण्याचे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. हे धरण हस्तांतरीत झाल्यास दिघा येथील पाणी समस्या दूर होण्यास मदत होईल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिले.
सर्व रेल्वे स्थानकांमधील शेड पत्रे, पंखे, लाईट, ध्वनिक्षेपक दुरूस्ती करणे तसेच बाहेरील पेव्हर ब्लॉक दुरूस्त करणे; स्थानका बाहेरचा परिसर स्वच्छ करणे; रेल्वे स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कुलर बसविण्यांत यावे; दिघा ते तुर्भे स्थानकाबाहेर बुट पॉलीश धारकांना जागा देणे; काही स्थानकांमध्ये उंचीच्या अनुषंगातून सरकते जिने बसविणे; ऐरोली स्थानकामध्ये आरक्षण खिडकी सुरू करणे; बहुमजली पार्किंग; कोपरखैरणे स्थानकाबाहेरील पार्किंग सुस्थितीत करणे; रात्रीची गस्त वाढविणे; रबाले स्थानक पश्चिमेकडील तिकीट खिडकी रात्री 11 वाजेपर्यंत चालू ठेवणे; सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे थांबलेले काम लवकर सुरू करणे अशा अनेक प्रलंबित समस्यांसंदर्भात डीआरएम हरेश मिना यांचीशी चर्चा करून या समस्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा व त्यानुसार कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
लवकरच नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांचा पाहणी दौरा डीआरएम यांच्यासमवेत आयोजित करण्यात येणार आहे. सिडको कडील रेल्वे स्टेशनच्या समस्या, नवी मुंबईमधील रेल्वे स्टेशन हस्तांतरित करण्यासंदर्भात सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमान अनेक भागात 45 अंशावर असताना,भडगाव तालुक्यात दिनेश पवार हा तेरा वर्षीय मुलाचा उष्माघात सदृश मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात भडगाव शहरात त्याच्यावर उपचार करणाऱ्या खासगी रूग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क केला असता,त्यांनीही या बाबत उष्माघात रुग्णात दिसून येत असलेली,उलटी, जुलाब,ताप सह बीपी कमी जास्त राहणे,अशी काही लक्षणे मयत दिनेश पवार याच्या मधेही आढळून आली होती, त्यामुळे प्राथमिक अंदाज नुसार उष्माघात असू शकतो,मात्र या बाबत अधिकृतरित्या माहिती पोस्ट मार्टेम अहवालाच्या नंतरच स्पष्ट होऊ शकेल अशी माहिती दिली आहे
दिनेश पवार याच्या उष्माघात सदृश मृत्यू मुळे ,उष्णतेच्या लाटे पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तद्न्य नि केले आहे
महाराष्ट्रातील काश्मीरातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करणार. त्याचा खर्च राज्य सरकार करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीच्या दिशेने रवाना. जम्मू काश्मीरमधील घटनस्थळाची भेट, अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर अमित शाह दिल्लीच्या दिशेने रवाना. संध्याकाळी होणाऱ्या सुरक्षेविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीला अमित शाह हजर राहणार
पहलगाममधील सध्याच्या परिस्थितीमुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन इंडिगो एअरलाईन्सने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने श्रीनगरकडे येणाऱ्या व तिथून जाणाऱ्या प्रवाशांना मदतीचा हात देत कॅन्सलेशन व रेशेड्युलिंग शुल्कावर सवलती जाहीर केल्या आहेत.
इंडिगोने दिल्लीतून आणि मुंबईतून श्रीनगरकडे विशेष उड्डाणे सुरु केली असून ती तत्काळ प्रभावाने राबवण्यात येणार आहेत. ही उड्डाणे सध्या सुरु असलेल्या १६० आठवड्याच्या नियमित उड्डाणांव्यतिरिक्त असतील.
कंपनीने सांगितले की, ती परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि प्रवाशांना शक्य तितकी मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या आकस्मिक परिस्थितीत तिकीटांचे दर नियंत्रित ठेवण्याचेही प्रयत्न सुरु असून, ग्राहकांची सुरक्षितता आणि कार्यक्षम सेवा हेच आमचे प्राधान्य आहे, असे इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण ६ जणांना आपला जीव गमवावा लागला. काही वेळात संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगरहून मुंबईला एअर इंडियाच्या विमानाने आणले जाईल. हे विमान श्रीनगरहून दुपारी १२.१५ वाजता निघाले आहे. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन जाणारे विमान श्रीनगरहून दुपारी १.१५ वाजता निघेल आणि मुंबईला पोहोचेल. पुण्याहून कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी पुण्यात आणले जाईल, विमान सायंकाळी ६ वाजता निघेल. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर पोलिसांकडेन कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा समन्वयासाठी मुंबई विमानतळावर असतील, तर पुणे विमानतळ मंत्री माधुरी ताई मिसाळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
जम्मू-काश्मिर येथे सुरक्षित असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांची दि.23 एप्रिल 2025 दुपारी 2 वाजेपर्यंत प्राप्त माहिती पुढीलप्रमाणे:-
अनुष्का मोने (35 वर्षे), ऋचा मोने (18 वर्षे), मोनिका जोशी (45 वर्षे), ध्रुव जोशी (16 वर्षे), कविता लेले (46 वर्षे), हर्षल लेले (20 वर्षे), भुषण अशोक गोळे (39 वर्षे), ज्योती अशोक गोळे (36 वर्षे), आरव भुषण गोळे (8 वर्षे), विनोद विश्वास गोळे (41 वर्षे), माधुरी विनोद गोळे (41 वर्षे), विहान विनोद गोळे (11 वर्षे), स्वाती विश्वास गोळे (36 वर्षे), अतुल प्रकाश सोनवणे (42 वर्षे), प्रियंका अतुल सोनवणे (34 वर्षे), अनन्या अतुल सोनवणे (12 वर्षे), अर्णव अतुल सोनवणे (8 वर्षे), नंदकुमार म्हात्रे (65 वर्षे), निलिमा म्हात्रे (65 वर्षे), निशांक म्हात्रे (31 वर्षे), प्रमदा पाटील (30 वर्षे), सुजन पाटील (63 वर्षे), आशा पाटील (60 वर्षे), नेहा ठाकूर (35 वर्षे), मनोज ठाकूर (39 वर्षे), विहान ठाकुर (07 वर्षे), संजय म्हात्रे (58 वर्षे), स्वाती म्हात्रे (49 वर्षे), नेत्रा भूषण पांगेरकर (37 वर्षे), भूषण इंद्रनाथ पांगेरकर (40 वर्षे), इंद्रायणी इंद्रनाथ पांगेरकर (65 वर्षे), श्लोक भूषण पांगेरकर (12 वर्षे), विहान देवेन ढोलम (05 वर्षे), गौरव सांगळे (37 वर्षे), दिपाली सांगळे (35 वर्षे), स्वाती सांगळे (40 वर्षे), वेद सांगळे (07 वर्षे), शुभ क्षीरसागर (10 वर्षे), मनाली प्रणय ठाकूर (28 वर्षे), प्रणय ठाकूर (29 वर्षे).
या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.
त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:
दूरध्वनी क्रमांक: ०१९४-२४८३६५१, ०१९४-२४५७५४३, व्हॉट्सॲप क्रमांक: ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या डोंबिवली आणि पनवेलमधील पर्यटकांचे मृतदेह थोड्याचवेळात मुंबई विमानतळावर आणण्यात येतील. त्यासाठी शिवसेना आणि भाजपचे नेते मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. रवींद्र चव्हाण डोंबिवलीतील तीन पर्यटकांचे मृतदेह घेऊन त्यांच्या घरी जाणार आहेत.
* भारतावरचा हल्ला आहे
* काश्मिरची आर्थिक परिस्थिती सुधारत होत
* कश्मीर मधली पर्यटकांची गर्दी वाढत होती कश्मीर पूर्वपदावर येत होतं
* लोक असे म्हणतात स्वित्झरलँड पेक्षा काश्मीर सुंदर आहे
* हा पर्यटकांवरील हल्ला नाही हा काश्मिरी लोकांवर चा हल्ला आहे
* प्रश्न पोटापाण्याचा आहे आता पोटापाण्यावर आलेला आहे त्यांच्या
* यात हिंदू मुसलमान काही प्रश्नच येत नाही
* त्या लोकांनी काय केलं हा नीच आणि घाणेरडा प्रकार आहे
* गेल्या चार वर्ष मिलेक्ट्री मध्ये भरती झालेली नाही
* जवानांची संख्या दोन लाखांनी कमी झाली
* काय जागतिक शांततेचा करार झाला होता का? आपल्यावर पाकिस्तान बांगलादेश आपले जे दुश्मन राष्ट्र आहेत यांच्यातून कारवाया होणार नाही असा गोड गैरसमज झाला होता का?
* जेवण एक वेळेस कमी केलं तरी चालेल पण सीमा सुरक्षित राहिली पाहिजे
* एकही पोलीस किंवा मिलिटरी चा माणूस नव्हता ते नंतर आले सगळे झाल्यानंतर
* कडक मिलिटरी बंदोबस्त असेल तर अतिरेकी कारवाया होत नाहीत
* आपल्या गुप्तचर विभागाचा फेलीवर आहे
* याच्यावर राजकारण करायचं नाही या हल्ल्याचा निंदा करूया
* आपला राष्ट्र आपलं सरकार जी भूमिका घेईल त्याच्या मागे उभा राहूया
* ज्या लोकांनी कश्मीरला मागे घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांना कश्मीरीच उत्तर देतील
* कश्मीर जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे
* पहलगाम जिथे हल्ला झाला तिथे यापूर्वी कधीच हल्ला झाला नाही
* पहलगाम ही सगळ्यात आवडती जागा आहे पर्यटकांची
* कश्मीर पायावर उभे राहतंय त्यांना लूळ करण्याचा हा डाव आहे
* हा जातीय धर्मीय द्वेष पसरवला जातो
* भारतामध्ये एकता निर्माण होते त्याला सुरुंग लावण्याचा हा प्रयत्न आहे
* देशात सगळीकडेच निषेध होत आहे काश्मीरमध्ये निषेध होतोय
* प्रश्न धर्माचा नाही तर पोटापाण्याचा आहे
* कश्मीरला लुळ पांगळा करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे याच्यात पाकिस्तान सामील आहेत
भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई विमानतळावर दाखल. काश्मीरमध्ये मृत्यू झालेल्या पर्यटकांत तीन जण डोंबिवलीमधील. कालपासून रविंद्र चव्हाण मृतांच्या नातेवाईकांच्या संपर्कात. तिन्ही पर्यटकांचे पार्थिव घेऊन रविंद्र चव्हाण डोंबिवलीला रवाना होणार. संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी रविंद्र चव्हाण करत आहेत मदत
दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो.... कोकणातून पर्यटनासाठी काश्मीर मध्ये गेलेल्या पर्यटकांची भावना.
दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगर भागातील सर्व हॉटेल्स आणि होम स्टे हाऊस फुल्ल...लोकांची पळापळ.
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर मधील परिस्थिती बाबत कोकणातील पाटील आणि संसारे कुटुंबाने शेअर केला अंगावर काटा आणणारा अनुभव.
भारतीय लष्कर आणि भारत सरकार कडून पर्यटकांना वेळच्या वेळी मदत मिळत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात.
कोकणातील गुहागर मधून काश्मीर मध्ये फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबाने शेअर केला अनुभव.....
काश्मीरमधील नागरिकांकडून पर्यटकांना दिला जातोय धीर...
दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा पर्यटकांवर नसून आमच्यावरती केलेला हल्ला असे आम्ही मानतो.... त्यांनी मारलेली प्रत्येक गोळी हे आमच्या छातीवर असल्याचे आमची भावना : पर्यटकांना अधीर देताना काश्मीरच्या नागरिकांचे वक्तव्य
लोकेशन : काश्मीर
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील संशयित हल्लेखोराचा पहिला फोटो समोर आला होता. हा फोटो घटनेच्या ठिकाणचा आहे, ज्यामध्ये तो हल्ला करणारा दहशतवादी हातात बंदूक धरलेला दिसत आहे, जरी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
एकनाथ शिंदेची शिवसेना उतरली रस्त्यावर
परभणीत त्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेची निदर्शन
यांना घुसून मारा आणि आतंकवादाचा बिमोड करा-शिवसेना
कश्मीरच्या पहेलगाम येतील घाटी मध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आज परभणीत एकनाथ शिंदे च्या शिवसेनेकडून या घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने करत शिवसैनिक चालून गेले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले ज्यामध्ये या हल्लेखोरांना घुसून मारून आतंकवादाचा बीमोड करण्याची मागणी शिवसेनेचे नेते माजी खासदार सुरेश जाधव यांनी केली आहे.
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत.
इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.
#Pahalgam
https://x.com/cmomaharashtra/status/1914932439878685156?s=46&t=S0m9fgIBggcpst3bZGqn1g
कोल्हापूर
केवळ दैव बलवत्तर म्हणून पहेलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातून वाचले कोल्हापुरातील पर्यटक
वेळेत घोडे न मिळाल्याने कोल्हापुरातील अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पहेलगाम पर्यंत पोहोचण्यासाठी झाला उशीर
पहलगाम पासून दीड किलोमीटर मागे असतानाच सुरू झाला दहशतवादी हल्ला
ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने हल्ल्याची माहिती देताच माघारी फिरले अनिल कुरणे आणि त्यांचे सहकारी
सध्या अनिल कुरणे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी जम्मू काश्मीर मध्ये सुखरूप
पेहलगाम आंतकवादी हल्ल्यात बळी पडलेल्या डोंबिवली मधील तीन पर्यटक आणि पुणे येथील एक पर्यटकाचे पार्थिव श्रीनगर विमानतळावर पोहचले आहेत…
श्रीनगर ते मुंबई थेट विमान दुपारी १२:२० वाजता निघणार आहे.
तर दुसरे विमान दुपारी १:३० मिनिटांनी मुंबईसाठी निघणार आहे.
पुणे
Byte
सुप्रिया सुळे
काल दिल्लीमध्ये वन नेशन इलेक्शन बाबत बैठक सुरू होती
त्या बैठकीमध्येच आम्हाला या सगळ्या घटनेची माहिती मिळाली
आम्ही सगळे खासदार तिथे होतो सगळ्यांना थोडी थोडी माहिती आम्हाला सगळ्यांना मिळत होती
आम्ही संध्याकाळी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांना फोन केला आणि माहिती घेतली
आम्ही पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्हाला समजलं की पुण्यातील दोन लोकांना कदाचित गोळ्या लागल्या आहेत
खूप दुर्दैवी आपण कितीही निषेध केला तरी कमीच पडणार आहे
अत्यंत गंभीर हा विषय आहे
जोपर्यंत गृहमंत्रालय ऑफिशियल स्टेटमेंट देत नाहीत तोपर्यंत सगळ्यांनी जबाबदारीने स्टेटमेंट दिले पाहिजेत
अजूनही अनेक लोक अनेक भागात अडकले आहेत
सगळी यंत्रणा अतिशय ऍक्टिव्ह पणे मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
आता टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही
पहिले भारतीय लोक सुरक्षित आहेत का याला प्राधान्य देणे गरजेचे आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सगळ्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी आणि सगळ्यांना ब्रिफिंग करावं
विमानाने परत येण्याची तिकीट आता तिकडे महागडी झाली आहेत
मी विमान आणि रेल्वे यंत्रणेला फोन करण्याचा प्रयत्न केलेला आहे
ही काही प्रॉफिट कमवायची वेळ नाही
प्रत्येकाला सुखरूप घरी पोहोचवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे
पुणे
Byte
सुप्रिया सुळे
काल दिल्लीमध्ये वन नेशन इलेक्शन बाबत बैठक सुरू होती
त्या बैठकीमध्येच आम्हाला या सगळ्या घटनेची माहिती मिळाली
आम्ही सगळे खासदार तिथे होतो सगळ्यांना थोडी थोडी माहिती आम्हाला सगळ्यांना मिळत होती
आम्ही संध्याकाळी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांना फोन केला आणि माहिती घेतली
आम्ही पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्हाला समजलं की पुण्यातील दोन लोकांना कदाचित गोळ्या लागल्या आहेत
खूप दुर्दैवी आपण कितीही निषेध केला तरी कमीच पडणार आहे
अत्यंत गंभीर हा विषय आहे
जोपर्यंत गृहमंत्रालय ऑफिशियल स्टेटमेंट देत नाहीत तोपर्यंत सगळ्यांनी जबाबदारीने स्टेटमेंट दिले पाहिजेत
अजूनही अनेक लोक अनेक भागात अडकले आहेत
सगळी यंत्रणा अतिशय ऍक्टिव्ह पणे मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
आता टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही
पहिले भारतीय लोक सुरक्षित आहेत का याला प्राधान्य देणे गरजेचे आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सगळ्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी आणि सगळ्यांना ब्रिफिंग करावं
विमानाने परत येण्याची तिकीट आता तिकडे महागडी झाली आहेत
मी विमान आणि रेल्वे यंत्रणेला फोन करण्याचा प्रयत्न केलेला आहे
ही काही प्रॉफिट कमवायची वेळ नाही
प्रत्येकाला सुखरूप घरी पोहोचवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे
कोल्हापूर
कोल्हापुरात अपघाती मृत्यू झालेल्या बाईक रायडरच्या हेल्मेट कॅमेऱ्यातील फुटेज आलं समोर
भरधाव बाईकच्या अपघाताचा थरार हेल्मेट कॅमेऱ्यात कैद
दोन दिवसांपूर्वी आजरा परिसरात झालेल्या अपघातात बाईक रायडर सिद्धेश रेडेकर याचा झाला होता मृत्यू
भरधाव स्पोर्ट बाईक तवेरा ला धडकून झाला होता भीषण अपघात
राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला आहे.
ज्या पद्धतीने पुलवामा अटॅक नंतर भारताने उत्तर दिलं अगदी त्याच पद्धतीने याही हल्ल्याचे उत्तर देण्याची गरज.
दुर्दैव म्हणजे धर्म विचारून इथे लोकांना मारले गेले त्यामुळे सातत्याने दुसऱ्या बाजू घेणाऱ्या राजकारण्यांनी आता या प्रश्नात उत्तर द्यावं.
पूर्वीपेक्षा दहशतवाद आता कमी झाला आहे खूप दिवसानंतर अशी घटना घडली आहे , विरोधक टीका करत आहे हे त्यांचे काम आहे मात्र या हल्ल्याला उत्तर दिल्या जाईल..
पहलगामच्या बैसरनमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याठिकाणी हल्ल्याच्या काही तास आधी कोल्हापुरातील तीन कुटुंब होती.. सुदैवाने ही कुटुंब दहशतवादी हल्ल्यातून वाचले आहेत... पहलगामला गेलेले पर्यटक काल रात्री कोल्हापुरात दाखल झाले आहेत... ही घटना समजल्यानंतर आज सकाळपर्यंत पाहुण्यांचे फोन येत होते...घरातील सदस्य घाबरून गेले आहेत...केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो असून आता भारत सरकारने कठोर निर्णय घेऊन दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे
जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा
- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
*पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत
*जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सोलापूर जिल्ह्यातील 47 नागरिक श्रीनगर येथील हॉटेलमध्ये सुरक्षित,
*टुरिस्ट कंपन्यांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क, जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर
0217 2731012 (फक्त सोलापूर जिल्ह्याकरिता)
सोलापूर, दिनांक 23(जिमाका):- जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकावर दहशतवाद्यांनी दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी हल्ला केला. यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील 47 नागरिक श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील आणखी काही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत किंवा नाही याविषयीची माहिती टुरिस्ट कंपन्यांशी संपर्क करून प्रशासन घेत आहे. तरी जम्मू कश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाची त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
जम्मू कश्मीर मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार व प्रांताधिकारी यांची सकाळी बैठक घेऊन गाव निहाय पर्यटकांच्या याद्या करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच तालुकास्तरावरील टुरिस्ट ऑपरेटर त्यांच्या संपर्कात राहून पर्यटकांची नावे घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रशासन जिल्हास्तरावरील सर्व टुरिस्ट कंपन्यांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील पर्यटकांचे नावे घेण्यात येत आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत संपर्क क्रमांक देण्यात आलेले असून जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर प्रशासनाला माहिती द्यावी. प्रशासनाच्या वतीने सर्व पर्यटकांना सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. तसेच सद्यस्थितीत मिळालेल्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 47 पर्यटक श्रीनगर येथे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली असून ते पर्यटक एकत्रित एका हॉटेलवर थांबलेले आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या किंवा जखमी असलेल्या पर्यटकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून तसेच ज्यांचे नातेवाईक जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले आहेत अशा नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाला संपर्क करावा व त्यांची माहिती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पिंपळनेर तालुका माढा येथील सरपंच राहुल पेटकर हे 47 नागरिकांसोबत श्रीनगर येथे एका हॉटेलमध्ये थांबलेले असून श्री. पेटकर यांच्याशी तसेच पोलीस पाटील यांच्याशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून त्यांच्या व सोबतच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेची माहिती घेतली तसेच त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक असलेले सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आलेले आहे.
संपर्क क्रमांक
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
सोलापूर
0217 2731012 (फक्त सोलापूर जिल्ह्याकरिता)
शक्तीसागर ढोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर - +919822515601
मदनसिंग परदेशी, सहाय्यक महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर - +919823065090
अरविंद चौगुले, महसूल सहाय्यक,जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर - +919359397524
दहशतवादी हल्ल्यामुळे प्रभावित पहलगामच्या पर्यटक आणि पीडितांच्या मदतीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडून कार्यवाही
श्रीनगरहून चार तर दिल्ली आणि मुंबई येथून प्रत्येकी दोन विशेष विमानांची व्यवस्था
भाडे आकारणी नियमित स्तरानुसार करण्याचे विमान कंपन्यांना निर्देश
काश्मीरमधील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी प्रभावित पर्यटक आणि पीडितांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्वरेने कार्यवाही सुरू केली आहे.
नायडू यांनी वैयक्तिकरित्या गृहमंत्र्यांशी संवाद साधला. ते चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहेत. तात्काळ मदतीच्या उपायांचा एक भाग म्हणून, श्रीनगरहून चार विशेष विमानांच्या उड्डाणांची त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबई येथून प्रत्येकी दोन विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतरही जर गरज पडली तर, अतिरिक्त उड्डाणांची तयारी ठेवण्यात आली आहे.
मंत्री राम मोहन नायडू यांनी सर्व एअरलाइन ऑपरेटर्सची तातडीची बैठक घेतली आहे. या संवेदनशील काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडणार नाही याची खात्री करून नियमित भाडे पातळी राखण्याचे निर्देश विमान सेवा देणा-या कंपन्यांना देण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त, राम मोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांना तेथील हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव आणण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांशी समन्वय साधून पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
नागरी उड्डाण मंत्रालय अत्यंत सतर्क आहे आणि हल्ल्यातील पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.
जळगाव
सुभाष देसाई बाईट्स
ऑन आगामी निवडणुका
राजकीय पक्ष म्हटल्यानंतर ताकाला जाऊन भांड लपवण्यामध्ये काही अर्थ नाही
राजकीय पक्षांची तपासणी व कसोटी ही निवडणुकीच्या निकालांवर ठरत असते
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला कशाप्रकारे तोंड द्यायचं याची सदैव पक्षांची तयारी सुरू असते
गेल्या वर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मोठ्या संख्येने वादळ सुरू होईल यासाठी सर्वच पक्षांना त्यामध्ये उतरावे लागणार आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तयारी सुरू केली आहे
ऑन जिल्ह्यातील दिग्गज पदाधिकाऱ्यांची फळी शिंदेंकडे गेली
गेल्या काळात मोठी घडामोडी झाली
आमदार खासदार काही नेते हे जरी पक्ष सोडून गेले असले तरीसुद्धा शिवसैनिक हा मात्र बाळासाहेबांवर निष्ठा ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठाम आहे
शिवसैनिकच ही पक्षाची ताकद आहे
आमदार खासदार नेत्यांची कमतरता पक्षात दिसत असली तरी त्यांची गरज नाही पक्षासाठी शिवसैनिक व तळागाळातील कार्यकर्ते समर्थ आहेत
ऑन जम्मू कश्मीर हल्ला
जम्मू कश्मीर मध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी
या घटनेत कदाचित मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
या घटनेत निरपराध लोकांची निर्गुण हत्या झाली
अतिरेक्यांनी यापूर्वी देखील अशा पद्धतीचे हल्ले केले होते मात्र या हल्ल्यात वेगळं हिंसेचे स्वरूप दिसत आहे
मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे
2015 मध्ये ही अशा पद्धतीने हल्ला झाला होता त्यावेळेस सरकारकडून घोषणा करण्यात आला की हा अखेरचा हल्ला असेल
हिंदुस्थानाच्या भूमीवर अतिरेक्यांना पाय ठेवू देणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते
घुस घुस के मारेंगे असं नरेंद्र मोदी म्हणाले मात्र तसं दिसत नाही
काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया या सुरूच आहेत यासाठी केंद्र सरकारने कोणती तयारी केलेली आहे?
अजूनही अशा पद्धतीचे हल्ले थांबवले जातील अतिरेकांना चोख उत्तर दिले जाईल अशा पद्धतीची कुठलीही माहिती मिळत नाही
56 इंच छाती असली तरी मात्र नरेंद्र मोदी यांचा व भाजपच हे अपयश आहे
उद्या पंधरा वर्षापासून सत्ता त्यांच्याकडे आहे त्यामुळे याबाबतची जबाबदारी ते कोणावरही टाकू शकत नाही
नाव आडनाव धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या हे हिंसाचाराचं वेगळं स्वरूप
आता हिंदू खतरे मे है असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही
जे हिंदुत्वाचा फार मोठा अभिमान बाळगतात त्यांना आता स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल व देशाची माफी मागावी लागेल
दीर्घकाळात मोदींच्या हाती सत्ता आहे मात्र दहशतवादी हल्ले ते रोखू शकले नाहीत
निरपराध लोकांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबीयांची व देशवासीयांची मोकळेपणाने माफी मागितली पाहिजे
दहशतवादी हल्ल्यामुळे प्रभावित पहलगामच्या पर्यटक आणि पीडितांच्या मदतीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडून कार्यवाही. श्रीनगरहून चार तर दिल्ली आणि मुंबई येथून प्रत्येकी दोन विशेष विमानांची व्यवस्था. भाडे आकारणी नियमित स्तरानुसार करण्याचे विमान कंपन्यांना निर्देश
काश्मीरमधील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी प्रभावित पर्यटक आणि पीडितांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्वरेने कार्यवाही सुरू केली आहे. नायडू यांनी वैयक्तिकरित्या गृहमंत्र्यांशी संवाद साधला. ते चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहेत. तात्काळ मदतीच्या उपायांचा एक भाग म्हणून, श्रीनगरहून चार विशेष विमानांच्या उड्डाणांची त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबई येथून प्रत्येकी दोन विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतरही जर गरज पडली तर, अतिरिक्त उड्डाणांची तयारी ठेवण्यात आली आहे.
मंत्री राम मोहन नायडू यांनी सर्व एअरलाइन ऑपरेटर्सची तातडीची बैठक घेतली आहे. या संवेदनशील काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडणार नाही याची खात्री करून नियमित भाडे पातळी राखण्याचे निर्देश विमान सेवा देणा-या कंपन्यांना देण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त, राम मोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांना तेथील हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव आणण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांशी समन्वय साधून पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालय अत्यंत सतर्क आहे आणि हल्ल्यातील पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.
भंडारा जिल्ह्यातील ४८ पर्यटक हे जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले होते. मात्र, हल्ल्याच्या वेळी घटनास्थळ किंवा त्या परिसरात ते नव्हते. सर्व सुरक्षित असून ते सर्व ४८ पर्यटक महाराष्ट्रात परत येण्यासाठी प्रवासात आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिलेली आहे.
भंडारा :
भंडारा जिल्ह्यातील ४८ पर्यटक हे जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले होते. मात्र, हल्ल्याच्या वेळी घटनास्थळ किंवा त्या परिसरात ते नव्हते. सर्व सुरक्षित असून ते सर्व ४८ पर्यटक महाराष्ट्रात परत येण्यासाठी प्रवासात आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिलेली आहे.
सांगली-:
जम्मू काश्मीर मधील कालचा हल्ला आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटने बाबत सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन
शहरातून बाईक रॅली काढत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, शिवप्रतिष्ठानची सांगली जिल्हाधिकाऱ्याच्याकडे निवेदनातुन मागणी
जम्मू काश्मीर मध्ये हल्ला करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी देखील शिवप्रतिष्ठानने केली मागणी
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे निवेदन देण्यास उपस्थित
जालना -जालन्यातील साबळे कुटुंबातील तीन सदस्य पहेलगाम मध्ये अडकले असून तिघेही पहलगाम मध्ये सुखरूप...
कुटुंबाची माहिती.
अँकर -जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या राजूर येथील एकाच कुटुंबातील तीन जन पहलगाम मध्ये अडकले आहेत, या सर्वांशी कुटुंबाचा संपर्क झाला असून ते पहलगाम येथील हील पार्क हॉटेल मध्ये सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
संदीप साबळे त्यांच्या पत्नी तेजस्विनी साबळे आणि मुलगा कौस्तुभ साबळे हे सुट्ट्या निमित्त जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेले होते.
दरम्यान पहलगाम मध्ये हल्ल्याच्या दिवशी ते हॉटेलमध्येच असल्यामुळे यातून सुखरूप बाचवल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
बाईट -गणेश साबळे (संदीप साबळे यांचे वडील)
एनआयएची टीम पहलगाममध्ये पोहोचली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत. त्यांच्या परतल्यानंतर, दिल्ली येथे सीसीएसची बैठक होईल. पंतप्रधान मोदी देखील यामध्ये सहभागी होतील.
संरक्षण मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सहभागी होत आहेत.
पहलगामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ मनसे चे आंदोलन
-
मनसेच्या राजगड कार्यलाय जवळ हल्ल्याचा निषेध केला जाणार
मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या पोस्ट नंतर मनसे सैनिक आक्रमक
रत्नागिरी
उद्योग मंत्री उदय सामंत byte on भ्याड हल्ला
कालचा हल्ला हा भ्याड हल्ला -- उदय सामंत
दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवली गेलीच पाहिजे
आमच्या देशाला पाकिस्तानने एवढ्या स्वस्तात घेऊ नये
अशा पद्धतीचा हल्ला भविष्यात होणार नाही याची दहशत आणि अद्दल पाकिस्तानच्या बाबतीत घडली पाहिजे, हे नागरिक म्हणून माझं मत आहे
On संजय राऊत
त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे
अशावेळी सर्व देशाने एकत्र आलं पाहिजे
हा पूर्ण देशावरचा हल्ला आहे
आपण स्वतःला देशभक्त समजत असू तर अशावेळी सर्वानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे
जे काही राजकारण करायचं आहे ते नंतर करू
संकटाच्या वेळी असं घाणेरडं राजकारण करणं हे वाईट आहे
पूर्ण महाराष्ट्र सरकार या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे - उदय सामंत
विजय वड्डेटीवार
आम्ही याचे निषेध करतो
भारत देशावरचा हल्ला आहे
इथे राजकारणचा विषय नाही पण इंटेलिजन्स चे फेल्यूर आहे
दहशतवाद्यांना रान मोकळे केले असे सगळ आहे इंटेलिजन्स काय करत होते
व्यवस्था करणे गरजेच होते
ज्या पद्धतीने धशतवाद्यांनी टार्गेट करून धर्मांद पणे गोळीबार केला
जम्मू काश्मीर मधून हिंदूंचे पलायन होत होते मग नोट बंदी झाली आणि बोलले जात होते की दहशतवाद संपेल पण सैंपल नाही
हे सरकारचे अपयश आहे
अडकलेलेय प्रवाशांना सुरक्षितपणे तिथून काढले पाहिजे
मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात तिथे बंदोबस्त असायला हवा
दोन धर्मांना एकमेकांसमोर उभे करण्याचा हा डाव असू शकतो
पहलगामध्ये झालेला दहशतवादी हल्ला फक्त पर्यटकांवरील हल्ला नाही, तर देशावर हल्ला असल्याची प्रतिक्रिया सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी दिली आहे..
मेजर जनरल अनिल बाम यांना सैन्य दलात काश्मीरमध्ये सेवेचा प्रदीर्घ अनुभव असून पहलगाम आणि परिसरामध्येही त्यांनी अनेक सैन्य ऑपरेशन्स राबवले आहे...
खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी नकाशाच्या द्वारे त्या भागातली भौगोलिक परिस्थिती तर समजावून सांगितलीच आहे... शिवाय त्यांनी या हल्ल्यासाठी पहलगामची निवड का करण्यात आली?? येणाऱ्या अमरनाथ यात्रेशी त्याचा काय संबंध आहे?? एवढ्या अंतर्गत भागात दहशतवादी का आणि कसे आले असतील?? तिथे सैन्याची उपस्थिती का नव्हती?? स्थानिक लोकांची दहशतवाद्यांना मदत मिळाली असेल का आणि ती कशी मिळाली असेल?? पाकिस्तान चा या हल्ल्यामागे कसा सहभाग आहे?? आणि येणाऱ्या काळात भारताचा प्रत्युत्तर कसा असेल?? या सर्व प्रश्नांवर मेजर जनरल अनिल बाम यांच्याशी खुलासेवार संवाद
काश्मीरातील अतिरेक्यांच्या हल्ल्याचा तीव्र निषेध
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सव स्थगित
काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात तीस भारतीय बांधवांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेचा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र निषेध करत आहे.
या घटनेने पक्षाला तीव्र दुःख झाले आहे. यामुळे आज, २३ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता बांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सव - २०२५ व पुरस्कार वितरण समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे.
श्री. सिद्धार्थ कांबळे कार्याध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस, मुंबई.
एअर इंडियाने पर्यटकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने श्रीनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त विमानांची घोषणा केली आहे. एअर इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, आज, २३ एप्रिल रोजी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त उड्डाणे चालवली जातील. एअर इंडियाने म्हटले आहे की, बुधवारी श्रीनगरहून दिल्लीला सकाळी ११:३० वाजता आणि मुंबईला दुपारी १२:०० वाजता उड्डाणे होतील. इतर सर्व विमाने श्रीनगरहून त्यांच्या नियोजित वेळेनुसार निघतील.
प्रवास रद्द केल्यास पूर्ण परतफेड
एअर इंडियाने प्रवाशांसाठी आणखी एक मोठी बातमी जाहीर केली आहे. त्यांनी सांगितले की, एअर इंडिया ३० एप्रिलपर्यंत, या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत रीबुकिंग आणि पूर्ण परतफेड सुविधा देखील प्रदान करेल. एअर इंडियाने सोशल मीडियावर पोस्ट केले की, '३० एप्रिल २०२५ पर्यंत श्रीनगरहून किंवा श्रीनगरला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी बुक केलेल्या प्रवाशांना तारीख बदल शुल्क आणि भाडे फरक पूर्णपणे माफ करून त्यांचा प्रवास पुन्हा वेळापत्रकबद्ध करण्याची सुविधा दिली जात आहे. प्रवाशी त्यांचे बुकिंग रद्द करण्याचा आणि त्यांच्या मूळ पेमेंट पद्धतीचा पूर्ण परतावा मिळवण्याचा पर्याय देखील निवडू शकतात.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनआयएचे पथक पहेलगामला जाऊन दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणाची पाहणी करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पहेलगामला जाण्याची शक्यता आहे.
पुलावमानंतर सगळ्यात मोठा हल्ला आहे. सिक्युरिटी लॅप्स होता, त्यात राजकीय फायदा मोदी यांनी घेतला. पहेलगाममध्ये हल्ला झाला, त्यात महाराष्ट्रातील सहा जण मारले गेले. ही सगळी जबाबदारी केंद्राची आहे, गृहमंत्र्यांची आहे. घटनास्थळी पोलीस आणि इतर सुरक्षा नव्हती. अमित शाह तिथे जातात तेव्हा 75 कार आणि 500 गनमन असतात. लष्कारातील 2 लाख पदं रिक्त आहेत. काल जो हल्ला झाला त्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह जबाबदार आहेत.
नागपूरचे पृथ्वीराज वाघमारे त्यांच्या सात सदस्य कुटुंबीयांसह सध्या काश्मीरमध्ये असून श्रीनगर मध्ये एका हॉटेलमध्ये अडकले आहेत. विशेष म्हणजे पहलगाममध्ये ज्या ठिकाणी काल भ्याड दहशतवादी हल्ला झाला, दोनच दिवसांपूर्वी पृथ्वीराज वाघमारे त्यांच्या कुटुंबीयांसह त्याच पर्यटन स्थळावर उपस्थित होते.. तेव्हा परिस्थिती एकदम शांत होती.. मात्र कालपासून परिस्थिती अत्यंत तणावाची झाली आहे.. काश्मीरमध्ये प्रत्येक ठिकाणी सुरक्षा दल दिसत आहे.. आकाशात हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि विमानांची सतत टेहळणी सुरू असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज वाघमारे यांनी 'एबीपी माझा'शी व्हिडिओ कॉल वर श्रीनगर मधून बोलताना दिली आहे.
पृथ्वीराज वाघमारे हे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या परिसरात राहतात.. त्यामुळे बावनकुळेनी त्यांच्याशी रात्री संपर्क साधले असून वाघमारे कुटुंबीयांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहितीही पृथ्वीराज वाघमारे यांनी दिली आहे.. मात्र वाघमारे कुटुंबीय महिला आणि मुलांसह सध्या काश्मीरमध्ये असल्यामुळे एक भीतीचा वातावरण ते अनुभवत आहेत आणि लवकरात लवकर महाराष्ट्रात येऊ इच्छितात अशी इच्छा वाघमारे कुटुंबीयांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.
पहेलगाम येथे झालेल्या अतिरिकी हल्यात अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सत्तेत आलेल्या 56 इंची छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे अपयश असल्याने त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी मंत्री सुभाष देसाई यांनी जळगाव येथे दिली आहे
बुलढाण्यातील पाच जण पहेलगाममध्ये अडकले. काल पहेलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा हे पाच जण तेथील हॉटेलमधेच होते. ते बाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबविल व सांगितल की बाहेर फायरिंग सुरु झाली आहे... बाहेर फिरायला पडू नका. हे पाच जण 18 तारखेला जम्मू काश्मीर मध्ये गेले होते. यामध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत.. सध्या जैन परिवार पहेलगाम हॉटेल मध्येच आश्रयला आहेत
त्यांची नावे
निलेश जैन
पारस अरुण जैन
ऋषभ अरुण जैन
सौ श्वेता निलेश जैन
अनुष्का निलेश जैन
नाशिकमधील 40 ते 50 लोक सध्या काश्मीरमध्ये आहेत. सर्वजण सुखरूप आहेत. मात्र, अनेकांच्या मनात भीती आणि चलबिचल आहे. त्यातील अनेक पर्यटक परतीच्या मार्गावर असल्याची माहिती ब्रिजमोहन टूर्सचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली आहे. याआधी यात्रेकरूना लक्ष केले जात होते मात्र पहिल्यांदाच पर्यटकांना लक्ष केल्याने काश्मीरच्या पर्यटनाला त्याचा फटका बसणार आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली
पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातून गेलेले पर्यटक आज येणार परत. विजय पारगे यांच्यासह पुण्यातील एकूण 22 जणांचा ग्रुप या हल्ल्या आधीच पहेलगाम मधून पडला होता बाहेर. पुण्यातून गेलेली 22 पर्यटक जम्मू काश्मीरच्या विमानतळावर दाखल. जम्मू काश्मीर ते मुंबई या विमानाने पुण्यातील 22 पर्यटक दुपारी मुंबईत येणार.
रत्नागिरी- पेहलगाम इथल्या दहशतवादी हल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट. पोलिसांकडून किनारपट्टी भागात डोळ्यात तेल घालून गस्त. किनारपट्टी भागात चेकपोस्ट, संशयित हालचालींवर लक्ष्य ठेवण्याचे आदेश. गर्दीच्या किनाऱ्यावर 24 तास गस्त तर पर्यटनस्थळी बंदोबस्तात वाढ. किनारपट्टी भागात लँडिंग पाॅईटवर विशेष नजर, रत्नागिरी जिल्ह्यात ३६ लॅडिंग पाॅईट
दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानचे असल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला शंका येऊ नये म्हणून स्थानिक भाषेत संवाद साधला जात होता. पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती समोर आली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
२२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं?
३:४५ - पहलगाम येथे गोळीबार झाल्याची माहिती
पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी
४ वाजून ४ मिनिटे - मोठा फौजफाटा, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
हल्लेखोरांकडून पर्यटक जखमी झाल्याची माहिती
४ वाजून २९ मिनिटे - भाजप नेते रवींद्र रैना यांची प्रतिक्रिया
४ वाजून ३० मिनिटे - हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अधिकची कुमक घटनास्थळी
४ वाजून ३० मिनिटे - पीडीपी नेता मेहबुबा मुफ्ती यांची प्रतिक्रिया
संध्याकाळी ५ वाजता - जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
५ वाजून ३७ मिनिटे - पंतप्रधान मोदींचा अमित शाह यांना फोन
तातडीने योग्य त्या उपाययोजना आणि घटनास्थळी जाण्याची सुचना
५ वाजून ३५ मिनिटे - मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला राजधानी श्रीनगरमध्ये
५ वाजून ४० मिनिटे - जखमी पर्यटक पहलगाम इस्पितळात दाखल
५ वाजून ५७ मिनिटे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया
दहशतवादी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
६ वाजून ३ मिनिटे - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून हल्ल्याचा निषेध
६ वाजून १९ मिनिटे - विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
६ वाजून ३१ मिनिटे - पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; हल्ल्यामागील गुन्हेगारांना कठोर शासन करण्याचे आश्वासन
६ वाजून ३५ मिनिटे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ताफा काश्मीरसाठी रवाना
६ वाजून २६ मिनिटे - कर्नाटकचे रहिवासी हल्ल्यात बळी ठरल्याची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची माहिती
६ वाजून ४५ मिनिटे - हल्ल्यात गुजरातमधील पर्यटक बळी, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांची माहिती
६ वाजून ४६ मिनिटे - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध
६ वाजून ५६ मिनिटे - दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरू झाल्याची राजभवनाकडून माहिती
७ वाजून ६ मिनिटे - देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हल्ल्याचा निषेध
७ वाजून २० मिनिटे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे विमानाचे श्रीनगरच्या दिशेने उड्डाण
७ वाजून ३५ मिनिटे- जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पहलगामच्या दिशेने रवाना
७ वाजून ४२ मिनिटे - आर्मीच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचेन्द्र कुमार दिल्लीहून श्रीनगरच्या दिशेने रवाना
संध्याकाळी ८ वाजता - हल्ल्यात जखमी झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची यादी जाहीर
८ वाजून ९ मिनिटे - जम्मू काश्मीर सरकारकडून आप्तकालीन नियंत्रण कक्षाची हेल्पलाईन जारी
८ वाजून ३२ मिनिटे- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माध्यमांना प्रतिक्रिया, महाराष्ट्रातील पर्यटक हल्ल्यात बळी ठरल्याची माहिती
८ वाजून ४३ मिनिटे - गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमध्ये पोहचले, उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीला सुरुवात
८ वाजून ५६ मिनिटे - श्रीनगरमध्ये स्थानिकांकडून मेणबत्ती मोर्चा
९ वाजून १९ मिनिटे - राजधानी दिल्लीत सुरक्षा अलर्ट मोडवर
९ वाजून ४० मिनिटे - पूंच येथे दहशतवाद्यांविरोधात स्थानिकांची निदर्शने
१० वाजता - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू
जगभरातून काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध, भारताला जगभरातून शोकसंदेश आणि पाठिंबा
१० वाजून १८ मिनिटे - रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा शोकसंदेश तर दहशतवादाविरोधातील लढाईत भारताला पाठिंबा
सौदी अरेबियाच्या राष्ट्रप्रमुखांकडून आयोजित डिनर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रद्द
२३ एप्रिल
सौदी अरेबियाचे राष्ट्रप्रमुख मोहम्मद बिन सालेम यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध; भारतात नव्या दोन ऑइल रिफायनरीची घोषणा
रात्री १ वाजून १३ मिनिटे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात फोन
दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत असल्याचे ट्रंप यांचे आश्वासन
रात्री २ वाजून १० मिनिटे - पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यातून संपवून भारताच्या दिशेने रवाना
रात्री २ वाजून २३ मिनिटे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अमेरिका - पेरू देशाचा दौरा अर्ध्यातून रद्द
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावर संध्याकाळी ६ वाजता आणणार
जळगाव मधील पत्रकार तुषार वाघुळदे यांच्या पत्नी किशोरी वाघुळदे आणि त्यांच्या मैत्रिणी रेणुका भोगे या पहेलगाम येथे मुंबई येथील क्षितीश ट्रॅव्हल्स माध्यमातून गेल्या होत्या. हल्ला झाल्याची माहिती मिळताच ,आमच्या मधे भीती निर्माण झाली होती,मात्र त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षा त्यांना पुरविली असल्याने, त्या आणि त्यांचे सहकारी सुरक्षित आहेत,आम्ही आज पहाटे साडेपाच वाजता ट्रॅव्हल्समधून पहेलगाम येथून कटरा कडे जाण्या साठी निघाले आहोत. आम्ही सर्व सुरक्षित आहोत, अशी माहिती किशोरी वाघुळदे यांनी फोनवर दिली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील मंजुनाथ यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केले. नेमकं काय घडलं, याबाबत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
छत्रपती संभाजीनगरमधील अनेक लोक काश्मीर टूर रद्द करू लागले.संभाजीनगर शहरातून 15 ते 20 जणांचे बुकिंग कॅन्सल .मे महिन्यात जाणार होते काश्मीरला. श्रीनगर गुलमर्ग सोनमर्गची होती बुकिंग. टूर ऑपरेटर्स देत आहेत ट्रिप रद्द करण्याचा सल्ला. विमान तिकीट, हॉटेल्स बुकिंग केल्या रद्द
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील मृतांचा आकडा वाढला आहे. पुण्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात पोहचले. आज दिल्लीत कॅबिनेटच्या सुरक्षाविषयक समितीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक. मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यात आटोपला. रात्री २ वाजून १० मिनिटांनी नरेंद्र मोदी सौदी अरेबियाहून निघाले होते. जम्मू काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी भारतात
मंजूनाथ याची पत्नी पल्लवी यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यावेळी काय घडलं याबाबत माहिती दिली. आम्ही तीन जण, मी, माझे पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेले होते. हा हल्ला दुपारी दीड वाजताच्या सुमारास झाला. आम्ही पहलगाममध्ये होतो, माझ्या डोळ्यासमोर पतीला मारलं, असं पल्लवी यांनी सांगितलं. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेल्या असावरी जगदाळे या त्यांच्या मुलीने या हल्ल्याचा थरार पाहिला आहे. माझ्या डोळ्यासमोरच वडिलांना आणि काकांना गोळ्या घातल्या, त्यावेळी एकही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नव्हता असं असावरी जगदाळे म्हणाल्या. असावरी जगदाळे या हल्ल्यामध्ये जखमी झाल्या आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन. काश्मीरमधील महाराष्ट्रातील पर्यटकांना विशेष विमानाने परत आणण्याची विनंती
जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी,संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.
या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.
त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
दूरध्वनी क्रमांक:
०१९४-२४८३६५१
०१९४-२४५७५४३
व्हॉट्सॲप क्रमांक:
७७८०८०५१४४
७७८०९३८३९७
अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- भारत
- Pahalgam Terror Attack LIVE: पहलगाल हल्ल्यात जीव गमावलेल्या संतोष जगदाळे अन् गणबोटे यांचं पार्थिव पुण्यात दाखल