- जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांहून कमी आहे आणि तुम्ही 31 जुलैनंतर आयटी रिटर्न भरलात, तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.
- 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यीं 31 जुलैनंतर आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
- 5 लाख रुपयांहून अधिक जास्त उत्पन्न असलेल्यांनी 31 जुलै ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत आपलं आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
- 5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांनी 31 डिसेंबर 2018 नंतर आयटी रिटर्न भरल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.
करदात्यांना दिलासा, आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली!
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2018 10:13 PM (IST)
आयकर अधिनियम 1961 मध्ये कलम 234-F समाविष्ट करण्यात आले आहे. हे कलम 1 एप्रिल 2018 पासून लागू झाले आहे. यामध्ये नियोजित मुदतीत आयकर न भरल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : इनकम टॅक्स (आयटी) रिटर्न भरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरुन 31 ऑगस्टपर्यंत वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरलं नाही, त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. खरंतर दरवर्षी टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जलै असते आणि दरवर्षी तरीख वाढवली जाते. त्याप्रमाणे यंदाही केंद्र सरकारने आयकर दात्यांना एक महिन्याचा अवधी वाढवून दिला आहे. जर करदात्यांनी वेळेत आयकर भरला नाही, तर 5 हजार रुपये ते 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. दंडाचे नियम काय आहेत?