मोहनदास पै पुढं असंही म्हणाले की, 'भारतीय आयटी उद्योग आपल्या नव्या कर्मचाऱ्यांना योग्य पगार देत नाही. इतकंच नव्हे तर नव्या कर्मचाऱ्यांना पगार वाढवून देऊ नये यासाठी ते एकजूट होत आहेत. तसंच ते याविषयी आपआपसात चर्चाही करत असतात.'
रिपोर्टनुसार, दोन दशकापूर्वी या उद्योगात नव्यानं येणाऱ्या कर्मचाऱ्याला 2.25 लाख प्रतिवर्षी देण्यात येत होते. त्यात आता वाढ झाली आहे. पण ती देखील फारच कमी. आता नव्यानं येणाऱ्या कर्मचाऱ्याला 3.5 लाख प्रतिवर्ष वेतन देण्यात येत आहे. यावरुन असं दिसून येतं की, नव्या कर्मचाऱ्यांच्या पगारात फार वाढ झालेलीच नाही.
पै हे 1994 ते 2006 पर्यंत इन्फोसिसमध्ये सीएफओ म्हणून कार्यरत होते. पै यांच्या मते, 'नव्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले गेले पाहिजे. जर तुम्ही वेतनाता वाढ केली नाही तर तुमच्याकडे चांगलं टॅलेंट येणार नाही.'