... तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल : गुप्तचर यंत्रणा
एबीपी माझा वेब टीम | 14 Nov 2016 05:28 PM (IST)
नवी दिल्ली : चलन पुरवठा येत्या 48 तासात सुरळीत झाला नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण होईल, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिला आहे. एक दोन दिवसात चलन पुरवठा सुरळीत न झाल्यास एटीएम आणि बँकांबाहेरच्या गर्दीला सांभाळणं नियंत्रणाबाहेर जाईल, असं राज्यांनीही केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे. गुप्तचर यंत्रणांचा अहवाल स्वार्थी आणि असामाजिक तत्व समाजात सक्रिय झाले आहेत. ज्यांचं सरकारच्या निर्णयाने नुकसान झालं आहे, ते लोक नागरिकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत, असं गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे. नक्षली भाग, जम्मू काश्मीर या भागात एटीएम लुटण्याचे प्रकारही घडू शकतात. त्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा सल्लाही गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. केंद्राने आपत्कालीन सेवा, लग्न समारंभ, रुग्णालय आणि वृद्धांसाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी राज्यांनीही आपल्या अहवालात केली आहे. दरम्यान या इशाऱ्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या पोलिस महाचंसचालकांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच अर्थ मंत्रालय आणि बँकांनादेखील या अहवालाबाबत माहिती दिली आहे. संबंधित बातम्या