Indian Navy : भारतीय नौदलाचा एक खलाशी 27 फेब्रुवारीपासून नौदलाच्या जहाजातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून त्याचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, वेस्टर्न नेव्हल कमांडने सांगितले की, साहिल वर्मा असे खलाशीचे नाव असून या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Continues below advertisement


 


'नेव्हल बोर्ड ऑफ इन्क्वायरी'ला सविस्तर चौकशीचे आदेश


नौदल कमांडने सांगितले की, 'या घटनेत साहिल वर्मा 27 फेब्रुवारी 2024 पासून तैनात असताना भारतीय नौदलाच्या जहाजातून समुद्रात बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.' "नौदलाने जहाजे आणि विमानांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात केली आहे," कमांडने 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटलंय की, 'या घटनेची नेमकी परिस्थिती सध्या माहित नाही. 'नेव्हल बोर्ड ऑफ इन्क्वायरी'ला सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.' 


 






 



आणखी एक नौदल तळ भारतीय नौदलात सामील होणार 


भारतीय सागरी क्षेत्र मजबूत करण्यासाठी, भारतीय नौदल लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर नवीन नौदल तळ 'INS जटायू' कार्यान्वित करणार आहे. हा कार्यक्रम 4 किंवा 5 मार्चला होण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कमिशनिंगला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या नौदल तळावरून पाकिस्तान, मालदीव आणि चीनच्या हालचालींवर निश्चितपणे लक्ष ठेवता येईल. याशिवाय सोमालियन समुद्री आतंकवाद्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. यावेळी आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतही उपस्थित राहणार आहेत. ज्यावर कमांडर्स कॉन्फरन्सही अपेक्षित आहे.


 


मालदीव, पाकिस्तान, चीनच्या हालचालींवर थेट नजर ठेवता येईल


या काळात खलाशी आपली क्षमता आणि सामर्थ्य दाखवतील. याशिवाय पाणबुडी आणि कॅरियर बॅटल गटाकडून प्रदर्शन करण्यात येईल. मिनिकॉय येथील INS जटायू नौदल तळापासून मालदीवचे अंतर केवळ 524 किमी आहे. तसेच आखाती बेटाची एअरस्ट्रीपही अपग्रेड होणार आहे. जेणेकरून त्याचा वापर लढाऊ विमाने आणि अवजड विमाने चालवण्यासाठी करता येईल. तसेच मालदीव, पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर थेट नजर ठेवता येईल.


 


हेही वाचा>>>


ब्रिटीश जहाजाच्या मदतीला धावून गेलं भारतीय नौदल, तेल टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश, जहाजावर होते 22 भारतीय