India Coronavirus Update : भारतासह जगभरात ओमायक्रॉन प्रकारांमुळे कोरोनाची तिसरी लाट अद्यापही कायम आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये घट होत असली तरी परिस्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वात वाईट परिस्थिती कायम आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत 54 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे.


देशातील काही राज्यांची कोरोना परिस्थिती जाणून घेऊया


महाराष्ट्र
महाराष्ट्रात कोरोनाचे 24,948 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 45,648 रुग्ण बरे झाले आहेत, तर 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2,66,586 झाली आहे.


केरळ
केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,537 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात 30,225 रुग्ण बरे झाले आहेत, तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3,33,447 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, राज्यात 52,786 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


तामिळनाडू
तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचे 26,533 नवीन रुग्ण आढळले आहेत, 28,156 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि 48 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना राज्यात एकूण
सक्रिय प्रकरणांची संख्या 2,11,863 वर पोहोचली आहे.


दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,044 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 8,042 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आणि 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 29,152 वर गेली आहे.


झारखंड
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 912 नवीन रुग्ण आढळले असून 2,599 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सहा मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 10,383 झाली आहे.


उत्तराखंड
उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,813 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 3,042 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 30,927 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, सकारात्मकता दर 9.41 टक्क्यांवर वर गेला आहे.


पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे 3,805 नवीन रुग्ण आढळले आहेत. 13,767 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 34 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 45,729 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 19,86,667 वर गेली आहे तर, आतापर्यंत 20,515 लोकांचा मृत्यू झाला आहे.


आसाम
आसाममध्ये कोरोना विषाणूचे 2,861 नवीन रुग्ण आढळले आहेत. 6,002 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण 7,11,391 वर पोहोचले आहेत. राज्यात आतापर्यंत 6,400 लोकांचा मृत्यू झाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha