= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CEO स्वामींनी महिला अधिकारी यांना दिला ध्वजारोहणाचा मान ..! Solapur - जिल्हा परिषदेत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या मार्गावर महिलांची विशेष स्वदभावना रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये CEO दिलीप स्वामी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीड शहरातून खासदार प्रीतम मुंडेची भव्य तिरंगा रॅली, सलीम जहाँगीर यांनी बनवला 262 फुटांचा तिरंगा ध्वज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज बीड शहरामध्ये भव्यदिव्य तिरंगा रॅली काढण्या आली होती. भाजपाचे सलीम जहाँगीर यांनी 262 फुटांचा तिरंगा ध्वज बनवला असून या रॅलीमध्ये खा. प्रितम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.. आज सकाळी 262 फुटाचे तिरंगा ध्वज घेऊन शहरातून रॅली काढण्यात आली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
धुळे: जमियत उलेमा हिंद संस्थेने काढली शहरातून तिरंगा रॅली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानाच्या जनजागृतीसाठी धुळ्यातील जमीयत उलेमा हिंद यांच्यावतीने शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. आमदार फारुक शाह यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मुस्लिम समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रॅलीमुळे शहर तिरंगामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहराच्या विविध भागातून निघालेल्या या तिरंगा रॅलीचा देवपूर बस स्थानक येथे समारोप करण्यात आला. यावेळी मुस्लिम धर्मीय बांधवांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विविध कलाकृती मधून विध्यार्थी यांनी साकारला तिरंगा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभरात तिरंगा उपक्रमाचं आयोजन घाटकोपर येथील शिवाजी शिक्षण संस्था येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील 750 विद्यार्थ्यांनी भारतीय राष्ट्रधजावर आधारित विविध आकार शाळेच्या मैदानात साकारले. ज्यात सारेजहासें अच्छा व इतर स्वातंत्र्यावर आधारित गाण्याच्या तालावर नऊ फुट बाय 13.5 फूट आकाराचा झेंडा साकारुन त्यात विविध छटा सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी विशिष्ठ पद्धतीने उभे राहून अमृतमहोत्सवाचा 75 हा अंक साकारून त्या भोवती 75 तिरंगी ओढनी घेतलेल्या मुलींनी गोलाकार फिरून तिरंगाची प्रतिकृती साकारली. भारतातील महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, राजस्थान, काश्मिर, पंजाब, केरळा या सारख्या नऊ राज्यांच्या पारंपारिक गणवेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी तिरंगा हाती घेऊन संघराज्य एकीचे दर्शन घडविले तसेच शहीद भगतसिंह, राजगुरु, सुखदेव, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी इत्यादी व्यक्तीरेखा साकारुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना ध्वजवाटपही करण्यात आले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणीत पोलिसांची तिरंगा रॅली भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याने देशभरात अमृत महोत्सव साजरा केला जातोय. समाजातील विविध घटकांनी यात आपला सहभाग नोंदवला आहे. आज परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. पोलीस मुख्यालयापासून निघालेल्या या रॅलीत सर्व अधिकारी, कर्मचारी हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. शिवाय पोलीस व्हॅन, दुचाकी वरील पोलीस ही शहर वासियांचे लक्ष वेधून घेत होतं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वाशिम : विद्यार्थांकडून 75 लांब फुटाच्या पत्रांचं लेखन आजपासून देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' या उपक्रमाची सुरवात झाली. याच उपक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जिल्हापरिषदेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल अखंड अशा पंच्याहत्तर फुटाच्या पत्रांचं लेखन केलंय. या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केल्या. या पत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांचा आविष्कार दाखवीत विविध चित्र काढले. आपल्या मनातल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या कविता चारोळ्या या माध्यमातून विद्यार्थी पत्रातून व्यक्त केलं आहे. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.विद्यालयाचे शिक्षक गोपाल खाडे आणि विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. या कार्यक्रमाला पत्र लेखनासाठी कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने उपस्थित होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची (Independence Day) तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परळीत 150 फूट उंच तिरंगा ध्वजाचं लोकार्पण परळीत 150 फूट उंच तिरंगा ध्वजाचं लोकार्पण आज करण्यात आलं. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर हा ध्वज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने या स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सविस्तर बातमी येथे वाचा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई विद्यापीठात 320 फूट भव्य तिरंगा पदयात्रेचं आयोजन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात आज भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. 320 फूट लांब आणि नऊ फूट रुंद आकाराचा तिरंगा हे या पदयात्रेचं मुख्य आकर्षण होतं. राष्ट्रीय सेवा योजनेचे 700 हून अधिक स्वयंसेवक या तिरंगा पदयात्रेत सहभागी झाले होते. लेझिम पथकासंह सुरु होणारी ही पदयात्रा क्रीडा संकूल ते महात्मा जोतिबा फुले परीक्षा भवन ते फिरोजशहा मेहता भवन ते गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन असा प्रवास करत पुन्हा क्रीडा संकूल येथे या भव्य पदयात्रेचा समारोप झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जालना जिल्ह्यातील मंठा येथे 501 फुटांची तिरंगा रॅली जालना जिल्ह्यातील मंठा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 501 फुटी विक्रमी तिरंगा रॅली काढण्यात आली ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातील स्वामी महाविद्यालयात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा रॅली काढण्यात आली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी : मच्छिमार बांधवांची तिरंगा बोट रॅली देशाभरात सध्या 'हर घर तिरंगा' मोहिमेचा उत्साह दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पडवे गावच्या मच्छिमार बांधवांनी मच्छिमार बोटींच्या साहाय्यानं रॅली काढली. पडवे ते जयगड या गावांदरम्यान निघालेल्या शास्त्री खाडीतील तिरंगा रॅलीत शेकडो मच्छिमार बोटी सहभागी झाल्या होत्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नांदेड : प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाला नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी चिखलीकर म्हणाले की, 'मला आनंद आहे, नांदेड जिल्ह्यात हे आवाहन स्वीकारून मोठ्या प्रमाणात लोकांनी ध्वजवंदन केलं आहे. आज 13 ऑगस्ट रोजी ध्वजवंदन करायचा आहे आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सायंकाळी ध्वज सन्मानाने उतरवावयचा आहे. त्यामुळे सर्व जनतेने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलंय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वाशीम : मालेगाव शहरात भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शासनाच्या 'हर घर तिरंगा' या उपक्रमाअंतर्गत मालेगाव शहरामध्ये आज भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. मालेगाव शहरांच्या लहूजी नगरमधून ही भव्य दिव्य रॅली काढण्यात आली. शहरातील विविध चौकातून मार्गक्रमण करत अनेक जातीधर्माच्या महिला पुरुषांनी एकत्र येत मोटर सायकल रॅली काढली. या रॅलीत प्रत्येक जाती-धर्माच्या नागरिक आपआपल्या मोटरसायकलसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परळी : पंकजा मुंडे यांच्या रॅलीला सुरवात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त परळी शहरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये स्वतः पंकजा मुंडे यांनी सहभाग घेतला असून ढोल पथकात ढोल वाजवून पंकजा मुंडे अमृत महोत्सवाच्या उत्सवात सहभागी झाल्या आहेत. हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली असून यामध्ये शालेय विद्यार्थी विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक वकील सहभागी झाले आहेत. तर परळीकर देखील या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. सबंध परळी शहरात देश भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Aurangabad: औरंगाबादमध्ये 100 फुट स्मारकध्वजचे लोकार्पण सोहळा देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने प्रशासनाकडून अनेक अभियान राबवले जात आहे. दरम्यान औरंगाबादमध्येही 100 फुट स्मारकध्वजचे लोकार्पण सोहळा पार पडतोय. औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने 100 फुट स्मारकध्वज उभारण्यात येत आहे. शहारतील शासकीय कला महाविद्यालय शेजारी असलेल्या किलेअर्कमध्ये हा 100 फुट स्मारकध्वज उभारण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Aurangabad: औरंगाबादच्या ऐतिहासिक स्थळांवर राष्ट्रध्वज औरंगाबादच्या दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे. देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने प्रशासनाकडून अनेक अभियान राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय पुरातत्व विभागाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांवर राष्ट्रध्वज फडकवत रोषणाई केली आहे. दौलताबाद किल्ल्यावर फडकवण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे काही क्षण ड्रोन कॅमऱ्यातून टिपण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर : 303 फुटी राष्ट्रध्वज सलामी कार्यक्रम 'हर घर तिरंगा' या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर शहरातील 303 फुटी राष्ट्रध्वज सलामी कार्यक्रम सुरू झाला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आजपासून 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.