- तिसऱ्या दहशतवाद्याचाही खात्मा, सर्च ऑपरेशन चालूच
- जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख रउफ असगर या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड
- भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद, सर्च ऑपरेशन चालूच
- दहशतवादी हल्ल्यावर लष्कराकडून पहिली प्रतिक्रिया : या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. ज्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.
- 'सध्या ऑपरेशन सुरु आहे. ऑपरेशन जोवर संपत नाही तोवर काहीही सांगता येणार नाही. आमचं लष्कर आणि सुरक्षा दल मजबुतीने आपलं काम करत आहेत. भारताची मान आम्ही झुकवू देणार नाही. आमच्या शहीद जवानांचा आम्हाला अभिमान आहे.' अशी प्रतिक्रिया गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली
- वैष्णो देवीमध्येही हायअलर्ट जारी
- सुंजावा येथील ऑपरेशन लवकरात लवकर संपावं यासाठी उधमपूर आणि सरसवा येथून पॅरा कमांडर्संना पाचारण करण्यात आलं आहे.
- गेल्या सात तासापासून अतिरेक्यांचा धुमाकूळ सुरुच, अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
- या संपूर्ण घटनेवर संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाची नजर आहे. तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांशीही बातचीत केली आहे.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्या प्रकरणी एक मोठी माहिती दिली आहे. हा हल्ला केलेले सर्व दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत. जवानांनी या दहशतवाद्यांविरोधात आता जोरदार कारवाई सुरु केली आहे.
सुंजवाँ कॅम्प हल्ला, दोन जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम | 10 Feb 2018 08:03 AM (IST)
जम्मू-पठाणकोट मार्गावर असललेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू-पठाणकोट मार्गावर असललेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पहाटे साडेचारपासून सुरु असलेल्या या चकमकीत आतापर्यंत दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. लष्कराचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे. LIVE UPDATE :