नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोटारवाहन कायद्यात महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. यानुसार 4 वर्षांवरील मुलांना दुचाकीवर बसताना हेल्मेट घालणं अनिवार्य करण्यात येणार आहे. याचसोबत कारमधून प्रवास करत असताना मुलांना सेफ्टी बेल्ट लावणंही अनिवार्य केलं जाण्याची शक्यता आहे.


 

हा कायदा मोडणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र पगडी परिधान करणाऱ्या शिखांना या नियमातून वगळण्यात आलं आहे.

 

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हे विधेयक लोकसभेत सादर करताना राजकीय पक्षांकडून सहकार्याचं आवाहन केलं आहे. देशात रस्ते अपघातात दररोज 400 लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हे विधेयक मंजूर झालं तर अनेकांचे जीव वाचू शकतात.

 

या विधेयकात ड्रिंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत ट्रॅफिक पोलिसांकडे दंड ठोठावण्यासोबतच नियम तोडणाऱ्यांचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द करण्याचाही अधिकार असेल.

 

पाहा व्हिडीओ