यातली एक गोळी नवरदेवाच्या छातीत लागली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर वऱ्हांडींनी घटनास्थळाहून पळ काढला.
नीमगावात सीतापूर जिल्ह्यातल्या हाजीपूर गावातील वऱ्हाड आलं होतं. नवरदेवासोबत अनेक मित्रही होते. नवरदेवाच्या मित्रांच्या नाच-गाण्यामुळे लग्नाला उशीर झाला. रात्री एक वाजता जेव्हा वरात पुढे जात होती, तेव्हा काही जणांनी गोळीबार केला.
मुलीकडच्यांनी नवरदेवाला उचलून लग्नस्थळी आणलं. मात्र तिथेही नवरदेवाच्या मित्रांनी गोंधळ घातला. बंदुकीत गोळ्या भरताना त्यातली एक गोळी नवरदेवाला लागली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.