हा गोळीबार जाणूनबुजून करण्यात आला की चुकून झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा असा दावा केला आहे की, साखरपुड्याचा सोहळा पूर्ण झाल्याच्या आनंदात गोळीबार करण्यात आला. पण यावेळी निशाणा चुकल्याने ही दुर्घटना घडली.
मात्र वरपक्षाचा असा आरोप आहे की, नवरदेवावर निशाणा साधून हा गोळीबार करण्यात आला होता. एकदा नाही तर यावेळी तीन राऊंड फायर करण्यात आले. दरम्यान, गोळीबार करणारी व्यक्ती फरार झाली आहे. दुसरीकडे अशीही चर्चा सुरु आहे की, गोळीबार करणारा व्यक्ती हा या लग्नामुळे नाराज होता. त्याला कोणत्याही किंमतीवर हे लग्न मोडून नवऱ्या मुलीशी लग्न करायचं होतं. त्यामुळे त्याने हा गोळीबार केला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस सध्या कसून शोध घेत आहेत.