नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (26 जानेवारी) आयोजित ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल बर्‍याच दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ ​​लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.


शेतकरी नेत्यांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 93 जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर 200 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही.


गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांची नावं


आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग यांचा समावेश आहे. कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगबसिंग मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता,  ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गहलोत यांची नावं एफआयआरमध्ये आहेत. गुन्हेगारी कट रचणे, दरोडा, दरोड्याच्या वेळी प्राणघातक शस्त्राचा वापर, खुनाचा प्रयत्न करण्यासारख्या गंभीर कलमांसह एकूण 13 कलमांर्तगत ही कारवाई करण्यात आली आहे.


दिल्ली पोलिसांची 4 वाजता पत्रकार परिषद


कालच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या पत्रकार परिषदेत काल झालेल्या हिंसाचाराबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास आम्ही कधीच नाही म्हटलेलं नाही, असंही ते म्हणाले.




किसान मजदूर संघर्ष समितीने कट रचल्याचा संयुक्त किसान मोर्चाचा आरोप

संयुक्त किसान मोर्चाने किसान मजदूर संघर्ष समितीवर कट रचल्याचा आरोप केला आहे. संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं की, दीप सिद्धू आणि किसान मजदूर संघर्ष समिती या असामाजिक घटकांनी षडयंत्रांतर्गत शेतकरी आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.