नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना पायलटच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल एएआयबीने दिला आहे.


लातूरमध्ये मागील महिन्यात 25 मे रोजी उड्डाणानंतर मिनिटभराच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं.  मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सगळे जण या अपघातातून थोडक्यात बचावले.

हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली आणि अहवाला सादर केला.

प्राथमिक अहवालानुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना पायलटच्या निष्काळजीपणामुळे झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, हेलिपॅडच्या आजूबाजूच्या परिसरात वीजेचे खांब, तार यांसारख्या अडथळा ठरतील अशा वस्तू नसाव्यात. मात्र हा नियम पाळला नाही.

...तरीही पायलटने उड्डाण केलं!
त्या दिवशी तापमान जास्त होतं. पण हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन होतं हे समजण्यात पायलटची चूक झाली. शिवाय उष्ण वातावरणात हेलिकॉप्टरला उड्डाण घेणं कठीण असतं. त्यामुळे अशा परिस्थितीही जास्त वजन असल्याने त्याने उड्डाण करायला टाळायला हवं होतं, परंतु पायलटने हे नियम पाळले नाहीत, असं एएआयबीने अहवालात म्हटलं आहे.

हेलिकॉप्टर उडालं, 1 मिनिटात कोसळलं
25 मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास हेलिकॉप्टरने उड्डाण केलं. मात्र अवघ्या 1 मिनिटाच्या आतच पायलटने हेलिकॉप्टर खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी त्या मार्गात वीजेचा खांब आला. त्याचवेळी वीजेच्या ताराही  हेलिकॉप्टर मार्गात आल्या. दरम्यानच्या काळात वीजपुरवठा खंडीत झाला होता. क्षणार्धात हेलिकॉप्टर कोसळलं. वीजपुरवठा असल्यामुळे आणि हेलिकॉप्टर उंचीवर नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

संबंधित बातम्या

हेलिकॉप्टर उडालं, 1 मिनिटात कोसळलं, नेमकं काय घडलं?


लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं 

मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं? 

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर ट्रकवर कोसळलं

PHOTO : देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो