नवी दिल्ली : राजधानीत शनिवारी भजनपुरा येथे एक इमारत कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. तर, 13 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तीन विद्यार्थी अजूनही बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतंय. इमारतीत तासिका सुरू असताना हा अपघात झाला, ज्यामध्ये कोचिंग सेंटरच्या मालकाचादेखील मृत्यू झाला असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.


काही विद्यार्थी अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आठ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाच्या प्रमुखाने दिली.

अरविंद केजरीवाल घटनास्थळी भेट देणार, तिवारी ने जताया दुख
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन याबद्दल दुःख व्यक्त केले. दरम्यान, थोड्याच वेळात ते घटनास्थळाला भेट देणार आहेत. ''भजनपुराहून वाईट बातमी आलीय. देव सर्वांना सुरक्षित ठेवो, मी लवकरच घटनास्थळी भेट देणार आहे, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.


पीडितांच्या दुःखात सहभागी - तिवारी
दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी या घटनेसंबंधी ट्विट केलं आहे. ''भजनपुरा इमारत अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, यामुळे मी दुःखी झालोय, देव सर्वांच्या आत्म्यांना शांती दे, मी लवकरच भजनपुराला पोहचणार आहे, मी पीडितांच्या दुःखात सहभागी आहे, असं ट्विट तिवारी यांनी केलं आहे.

Special Report | दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची एन्ट्री, सात उमेदवार रिंगणात