रामाबाई गौड या 70 वर्षीय महिलेचा मुलीच्या घरी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह मूळगावी नेण्यासाठी जावई गोरे सिंह यांनी वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला.मात्र कोणीही येण्यास तयार न झाल्यामुळे सायकलवरुन मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला. भर दुपारी गोरे सिंह यांनी मृतदेह सायकलवर बांधला आणि रामाबाईंच्या मूळगावी पोहचवला.
गोरे सिंह यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि तीन मुलं होते. सर्वांनी आळीपाळीने सायकल चालवली. या घटनेत माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट म्हणजे गोरे सिंह यांना मदत करण्यासाठी सरकार तर दूरच मात्र त्यांचे शेजारी आणि इतर कोणाचेही हात धजावले नाही.