जम्मूच्या आरएसपुरा आणि नौशेराजवळील सीमाभागात वारंवार पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात येतो आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात 7 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते आहे.
या गोळीबारानंतर भारतीय सैन्यानंही पाकिस्तानवर आक्रमण केलं. पाकिस्तानच्या 5 ते 6 रेंजर पोस्टला या गोळीबारात उद्ध्वस्त करण्यात भारतीय जवानांना यश आलं. या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर राजौरीतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.