नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत 43,393 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 911 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 44,291 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्या आधी गुरुवारी 45,892 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 817 बाधितांचा मृत्यू झाला होता. तसेच  44,291 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. 


आतापर्यंत देशात 36 कोटी 89 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी एकाच दिवशी 40 लाख 23 हजार डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 42 कोटी 70 लाख कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 


देशातील आजची कोरोना स्थिती : 



  • एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 7 लाख 52 हजार 950

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 98 लाख 88 हजार 284

  • एकूण सक्रिय रुग्ण : 4 लाख 58 हजार 727

  • एकूण मृत्यू : 4 लाख 5 हजार 28


देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा 1.32 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 97 टक्के इतका आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 2 टक्क्याहून कमी आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतोय.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी खास पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे.  23 हजार कोटी रुपयांच्या इमर्जन्सी हेल्थ रिस्पॉन्स फंडला मंजुरी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पॅकेजची घोषणा केली होती. त्याला गुरुवारी नव्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली. 


राज्यातील स्थिती
गुरुवारी राज्यात 9,114 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झालं असून 121 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.02 टक्के एवढा आहे. गुरुवारी 8,815  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण 58,89,982  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.05 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 6.24 लाख व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,572 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


महत्वाच्या बातम्या :