नवी दिल्ली : भारताने दबाव वाढवल्यानंतर चीन आणि पाकिस्तानमधील मिलीभगत समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करताना संपूर्ण विचार करुन करा, असा इशारा चीनने भारताला दिला आहे.


पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनची एकूण 46 अब्ज रुपयांची गुंतवणूक आहे. त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणतीही कारवाई केल्यास त्याचा सरळ फटका चीनला बसणार आहे.

त्याचवेळी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याची भारताची मोहीम यशस्वी होताना दिसते आहे. कारण रशियाने पाकिस्तानसोबतचा MI-35 हेलिकॉप्टर देण्याचा करार रद्द केला आहे. शिवाय, पाकव्याप्त काश्मीरमधील एकत्रित युद्ध सरावही होणार नाही.