नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातील देश भारताच्या बाजूने उभे आहेत. मात्र चीन पुन्हा एकदा पाकस्तानच्या बाजून उभा राहिला आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी समर्थन द्यावं असं अपील भारतानं केलं. मात्र भारताची ही मागणी चीनने फेटाळली आहे.


पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्लाची जबाबदारी जैश ए मोहम्मदने घेतली आहे. अशावेळी भारताच्या सोबत राहण्याऐवजी चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा आहे. भारताने अनेकदा मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच यावं अशी मागणी संयुक्त राष्ट्रात अनेकदा केली. मात्र प्रत्येक वेळी चीनने यामध्ये खोड घातली आहे.


पाकिस्तानने भारतीय जवानांवरील हल्ल्याचा निषेध केला, तर याबाबत गंभीर चिंताही व्यक्तही केली. तसेच तपास न करता या हल्ल्याचा इस्लामाबादशी संबंध असल्याच्या आरोपांचं पाकिस्तानने खंडन केलं आहे.


गुरुवारी 3 वाजून 37 मिनिटांनी हा हल्ला झाला होता. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला.


VIDEO | शांततेचा भंग करणाऱ्यांना धडा शिकवणार : राजनाथ सिंह एबीपी माझा




संबधित बातम्या


Pulwama terror attack : देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं : शरद पवार


Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य


Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!


Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं


Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप


भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन


जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी


शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा


पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद