या स्किमनुसार, 31 मार्चअखेर काळापैसा घोषित करणाऱ्यांनाच याचा फायदा मिळणार आहे. दरम्यान याबद्दल माहिती देताना हसमुख अढिया यांनी नोटाबंदीनंतर देशातील प्रत्येक व्यवहारावर सरकारची बारकाईने नजर असून, बँकांमध्ये आपली काळी कमाई जमा करणाऱ्यांची यातून सुटका होणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले.
सीटीबीटीचे संचालक सुशील चंद्रा यांनीही देशभरातून 393 कोटी रुपयांचा काळेधन जप्त करण्यात आले असल्याचे यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या काळ्या कामाईत सोन्यासह रोख रकमेचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. यातील 76 कोटी रुपये सोन्याच्या स्वरुपात, तर 316 कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात जप्त करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.