मी पप्पांना सांगितलं होतं की पास करा, त्यांनी टॉपर बनवलं : रुबी राय
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2016 06:14 AM (IST)
पाटणा : मला बारावी परीक्षेत फक्त पास व्हायचं होतं, पण पप्पांनी मला टॉपर बनवलं, असं बिहारमध्ये कला शाखेची बनावट टॉपर रुबी रायने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं. विज्ञान शाखेतून सौरभ श्रेष्ठ आणि राहुल तर कला शाखेतून रुबी ही विद्यार्थिनी पहिली आली होती. बिहारमधील टॉपर घोटाळ्याची चौकशी एसआयटी करत आहे. एसआयटीने बोर्ड कार्यालयातून रुबी राय अटक केली. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली असून तिची रवानगी बेऊर कारागृहात करण्यात आली आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, रुबी रायने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, "मी पप्पांना म्हणाले होते की पास करा, त्यांनी तर टॉपर बनवलं. शिवाय बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका मी स्वत: लिहिली नव्हती."