मागील आठवड्यात शुक्रवारी तवांगमध्ये हवाईदलाचं हेलिकॉप्टर Mi-17 V5 कोसळलं होतं. या रेशन आणि आवश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये हवाईदलाचे पाच आणि भूदलाचे दोन जवान शहीद झाले होते.
परंतु सैन्याने निष्काळजीपणा दाखवत शहीदांचे मृतदेह तिरंग्याऐवजी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून कागदी बॉक्समध्ये ठेवण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली.
माजी कमांडर एच एस पनाग यांनी शहीदांच्या मृतदेहासोबत झालेल्या अमानवीय वर्तणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. क्रिकेटर गौतम गंभीरनेही ही घटना लाजिरवाणी असल्याचं ट्वीट केलं आहे.
https://twitter.com/GautamGambhir/status/917031987814305793
यानंतर हवाईदलालाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती. हा प्रकार म्हणजे मोठी चूक असल्याचं सांगत हवाईदलाने शहीदांचे पार्थिव सन्मानाने कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.