बीड: आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा तरुणाने आत्महत्या करू नये आणि नुसतं आंदोलन देखील करू नये, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ असा विश्वास मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त केला आहे. बीडमधील (Beed) सभेच्या माध्यमातून मराठा तरुणांना आवाहन करताना मनोज जरांगे भावुक झाल्याचं दिसून आलं. 


मनोज जारांगे पाटील यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू असून ते बीड जिल्ह्यातल्या मोरवड गावामध्ये आरक्षण सभेसाठी आले होते. यावेळी सभेसाठी आलेल्या मराठा बांधवांना आत्महत्या करू नका, आत्महत्या केल्यानंतर कुटुंब उघड्यावर येतं हे सांगताना मनोज जरांगे भावुक झाले. आता आपली लढाई अंतिम टप्प्यात आली असून सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ असं जरांगे पाटील म्हणाले.


Manoj Jarange On Maratha Reservation : रक्त सांडलंय, आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही


मनोज जरांगे पाटील 29 तारखेपासून यांनी सराटी अंतरवाली मध्ये मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे डावपेच खेळण्यात आले. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला आपण सोडणार नाहीत असे लक्षात आल्यानंतर त्यांनी आंदोलन चिघळण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये महिला आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणात जखमी झाले. एवढं होऊन देखील सरकारने अद्यापही लाठीचार्ज का केला याचे उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आंदोलनामध्ये आता आपलं रक्त सांडलं आहे, आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 


Manoj Jarange On OBC Reservation : ओबीसीतून आरक्षण नाही म्हणणाऱ्यांनी... 


मराठा समाज आरक्षणात बसत असतानाही आणि कायद्याचे सर्व निकष पार केले असून देखील मराठा समाजाला टिकणारं आरक्षण सरकारने का दिले नाही असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की, गायकवाड आयोगाने मराठा समाज हा मागास असल्याचं सिद्ध केलं होतं. तर याच मराठा समाजाला विदर्भामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळतं, मग मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाही? इतर समाजाला व्यवसायावर आधारित आरक्षण दिल जातं, मग मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचे काम सरकार का करत आहे? तर ओबीसीमधून जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर त्याचे निकष काय आहेत हे देखील सरकारने सांगायला पाहिजे.


ही बातमी वाचा: