Ajit Pawar On Beed बीड: राज्याची उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar On Beed) आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. सकाळीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या व त्यांच्या अडचणी सोडवल्या. तसेय युवा संवाद मेळाव्यातून अजित पवार यांनी राख गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचं सांगितलं. 

बीडमध्ये सगळ्या गँग आहेत , राखेची गँग, वाळूची गँग या सगळ्या गँग आहेत. इथे या सगळ्या गँग सुतासारख्या सरळ करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. बीड ही देवदेवतांची भूमी आहे. जनतेची सेवा करण्यासाठीचे बळ देण्याचे देवदेवतांना साकडे आहे. बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत, असं अजित पवार म्हणाले. तसेच बीडमध्ये मराठा आणि वंजारी यांच्यात अनेकदा वाद दिसून आले आहेत. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. जाती-जातीतील दुरावा आपल्याला संपवायचा आहे, असं अजित पवार यांनी सांगितले. तसेच प्रतिमा स्वच्छ ठेवा, असं आवाहन देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं. 

समाजात एकोपा राहील असे काम झाले पाहिजे- अजित पवार

शेतीत आता AI तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. बीडमध्ये तारांगण केले जाणार आहे. विमानतळ जिल्ह्याच्या जवळ असले पाहिजे. टप्प्याटप्याने राज्यातील विमानतळावर नाईट लँडिंग सुरू केले जाणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात - अंबाजोगाई येथील सुविधा वाढवण्यात येणार आहेत. पुढे जायचे असेल तर बेरजेचे राजकारत करत करत सर्वसमभाव राजकारण केले पाहजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दारूगोळा सांभाळणारा अल्पसंख्यक होता. समाजात एकोपा राहील असे काम झाले पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. 

दादागिरी खपून घेतली जाणार नाही; अजित पवारांनी भरला दम

यशवंतराव चव्हाण यांचं बेरजेच राजकारण आपल्याला करायचे आहे. कार्यकर्ते घेत असताना रेकॉर्ड बघा. आपल्या बाजूला चुकीच्या प्रकृतीचे लोक नकोत. माझ्या कामाची पद्धत आणि इथच्या कामाच्या पद्धतीत तफावत आहे, असंही अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवले. मी अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. यात महत्वाच्या कामाचा पाठपुरावा केला जाईल. 200 कोटी रुपयांची गुंतवणूक इथे केली जाणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. बेरोजगारी ,शिक्षण , व्यवसाय,शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहचवा. सोशल मीडियावरून तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करू नका. दादागिरी खपून घेतली जाणार नाही. धागेदोरे लांबपर्यंत पोहचत असतील, त्यावर पण कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवारांनी दिला. 

ही बातमीही वाचा:

Santosh Deshmukh Murder Case: पुढे-मागे गाड्या उभ्या करुन अडवले; काच फोडून संतोष देशमुखांना बाहेर खेचले; सुदर्शन घुलेने सांगितला अपहरणाचा थरार!