सरकारच्या निर्णयाविरोधात बाजार समित्यांचा उद्या बंद
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 03 Jul 2016 03:41 AM (IST)
नवी मुंबईः राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू एपीएमसीच्या नियंत्रणाबाहेर केल्यानंतर राज्यभरातल्या व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी उद्या राज्यभरातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. यासंदर्भात वाशीमध्ये व्यापारी आणि माथाडी कामगारांची जाहीर सभा होणार आहे. उपसमितीने काल घेतलेल्या निर्णयामध्ये माथाडी कामगारांना दिलासा मिळाला असला तरी व्यापाऱ्यांना संपूर्णपणे नियमन मुक्ती मिळाली नाही.