Travel : ऑफिसमध्ये कामाचा ताण, शहरातील गजबजाट...वाढते प्रदूषण...लोकांची गर्दी...ट्राफीक.. रोज रोज तेच जीवन.. कंटाळलात ना? या जीवनातून थोडा ब्रेक घेऊन फ्रेश होता आलं असतं तर असा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा एका सुंदर ठिकाणाबद्दल सांगत आहोत. जिथे गेल्यावर तुम्ही तुमचे सर्व टेन्शन विसराल, आणि निसर्गाच्या सानिध्यात एन्जॉय कराल. पावसाळ्यात तर इथे जणू स्वर्गच अवतरतो, ज्यामुळे तुमच्या तोंडातून आहाहा... असं आलं नाही तर नवलंच.. मुंबईत राहणाऱ्या लोकांनी वन डे पिकनिक करायलाही काही हरकत नाही.. जाणून घ्या महाराष्ट्रातील या प्रसिद्ध ठिकाणाबद्दल..


 


ताणतणाव होईल दूर.. जेव्हा इथे भेट द्याल


आम्ही ज्या ठिकाणा बद्दल सांगत आहोत ते ठिकाण म्हणजे इगतपुरी... मुंबईपासून जवळपास 120 किमी अंतरावर असलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे एक सुंदर ठिकाण आहे. जिथे सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य विखुरलेले आहे. पश्चिम घाटात वसलेले हे हिल स्टेशन म्हणजेच सह्याद्रीच्या सर्वात उंच टेकडीमुळे गिर्यारोहकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. लोक इगतपुरी येथे ध्यानासाठी देखील येतात. धम्म गिरी, जगातील सर्वात मोठ्या विपश्यना केंद्रांपैकी एक येथे आहे आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहे. या प्राचीन ध्यान केंद्रामध्ये, व्यक्ती केवळ मनःशांतीचा अनुभव घ्याल.




इगतपुरी - चित्रपटांच्या शूटिंगसाठी पहिली पसंत


इगतपुरीमध्ये कॅमल व्हॅली, भातसा रिव्हर व्हॅली, त्रिंगलवाडी किल्ला आदी ठिकाणे पर्यटकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. येथे तुम्ही काही ठिकाणी ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता जसे की बिटनगड ट्रेक आणि कुलनगड ट्रेक हे प्रसिद्ध आहेत. इगतपुरी हे रस्ते आणि रेल्वे मार्गांनी जोडलेले ठिकाण आहे. सातवाहन वंशाचे अनेक ऐतिहासिक किल्ले येथे आहेत. याशिवाय येथे ट्रेकिंग, रॅपलिंग आणि रॉक क्लाइंबिंगचाही आनंद लुटता येतो. बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शक आणि निर्माते इगतपुरीत चित्रपटांच्या शूटिंगसाठी येतात.  


कधी भेट द्याल?


ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी पावसाळा हा उत्तम काळ आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत इगतपुरीला जाणे सर्वात चांगले मानले जाते. या काळात चांगला पाऊस पडल्याने हे ठिकाण बहरते. मात्र उन्हाळ्यात इथे न येण्याचा सल्ला दिला जातो. लोक हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत इगतपुरीला भेट देऊ शकतात.   


कसे पोहचाल?


रस्त्याने : मुंबई ते इगतपुरी हे अंतर पहिल्या मार्गाने 121 किमी आणि दुसऱ्या मार्गाने 144 किमी आहे. हे दोन मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.


पहिला मार्ग: मुंबई - छेडा नगर - NH 160 ते जुना मुंबई आग्रा रोड - तळेगाव - बजरंग वाडा - इगतपुरी.


दुसरा मार्ग: मुंबई - छेडा नगर - ईस्टर्न एक्सप्रेस हायवे - भिवंडी रोड - वाडा रोड - NH 848 ते वाडा मार्गे शाहपूर रोड - कळमगाव - कसारा बायपास मार्गे NH 160 - बजरंग वाडा - इगतपुरी.


पहिल्या मार्गावरून जाण्यास 3 तास लागतील तर दुसऱ्या मार्गाने 4 तास लागतील त्यामुळे तुम्ही पहिल्या मार्गावरून जाण्याचा पर्याय निवडावा.   


बस, रेल्वेने कसे पोहचाल?


मुंबई ते इगतपुरी दरम्यान अनेक गाड्या धावतात. याच्या मदतीने तुम्ही 2 ते 3 तासात पोहोचाल. बसने मुंबई ते इगतपुरी ट्रेनचे वेळापत्रक, वेळा इत्यादी जाणून घ्या, तुम्ही बसनेही प्रवास करू शकता. तुम्हाला बसमधून वाटेत सुंदर नजारेही पाहायला मिळतील. बसचे तिकीट अंदाजे 450 ते 480 रुपये प्रति व्यक्ती आहे. मुंबईहून इगतपुरीला दररोज किमान एक बस जाते.


महत्त्वाची गोष्ट म्हणजे इगतपुरीला जाण्यासाठी तुम्हाला मुंबईहून सकाळी लवकर निघावे लागेल नाहीतर ट्रॅफिकमध्ये अडकलात तर प्रवासाला जास्त वेळ लागेल. हायवेवर नाश्त्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. येथे तुम्ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध डिश वडा पाव, मसाला पाव आणि पोहे इत्यादी खाऊ शकता. नाश्ता केल्यानंतर तुम्ही ठाण्याच्या आसपासच्या ठिकाणांनाही भेट देऊ शकता. 




कॅमल व्हॅली - फोटोग्राफीची आवड पूर्ण होईल


तुमची फोटोग्राफीची आवड कॅमल व्हॅलीमध्ये पूर्ण होऊ शकते. या ठिकाणी अनेक सुंदर धबधबे वाहतात, त्यापैकी अनेक 1000 फूट उंचीवरून वाहतात. कॅमल व्हॅली पावसाळ्यात खूप सुंदर दिसते.




धम्मगिरी विपश्यना केंद्र


धम्मगिरी, जगातील सर्वात मोठ्या विपश्यना केंद्रांपैकी एक येथे आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहे. या प्राचीन ध्यान केंद्रामध्ये केवळ शांतीचा अनुभव येत नाही तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो.



धुक्याने वेढलेली भातसा नदी


इगतपुरीत प्रवेश करण्यापूर्वी भातसा नदीच्या काठावर बांधलेली ही दरी पाहता येते. घनदाट जंगले, नदी आणि धुक्याने वेढलेली ही दरी इगतपुरीच्या सर्वात सुंदर आकर्षणांपैकी एक आहे. रात्री येथे कॅम्पिंग देखील करता येते. येथे राहून तुम्ही कॅम्प फायर, पक्षी निरीक्षण, बोर्ड गेम्स इत्यादींचा आनंद घेऊ शकता. 




त्रिंगलवाडी किल्ला - ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध


समुद्र किनाऱ्यापासून 3000 फूट उंचीवर बांधलेला त्रिंगलवाडी किल्ला ट्रेकर्समध्ये खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला अनेक ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतील. 


कळसूबाई शिखर - ट्रेकिंगचा आनंद घ्या


जर तुम्ही इगतपुरीत एक-दोन दिवसांपेक्षा जास्त काळ राहू शकत असाल तर तुम्ही 1646 मीटर उंच कळसूबाई शिखरावर ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे या डोंगराच्या पायथ्याशी बारी गाव आहे, जिथून ट्रॅक सुरू होतो. इगतपुरीपासून 30 किमी अंतरावर आहे. कळसूबाई शिखरावर गेल्यावर मन:शांती लाभेल. 


 


हेही वाचा>>>


Travel : पावसाळ्यात 'इथे' जणू स्वर्गच अवतरतो! महाराष्ट्रातील भगवान शंकराचे 'असे' ठिकाण, जे सह्याद्रीच्या कुशीत वसलंय


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )