Relationship Tips : आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला झटपट यश हवंय. आणि त्यासाठी तो व्यक्ती विविध मार्गांनी मेहनत करतानाही दिसतो. आणि एकदा त्याने यश मिळवले तर असे काही लोक असतात, ज्यांना ते बघवत नाही. मग ते सतत त्या व्यक्तीचा हेवा करू लागतात, त्यांच्याबद्दल वाईट-साईट बोलू लागतात. आता अशा लोकांना नेमकं कसं हाताळायचं? जाणून घ्या...


 


वाईट संगत तुमच्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनावर परिणाम करते


इथे चर्चा अशा लोकांची आहे. जे सतत दुसऱ्यांचा हेवा करत असतात. चांगल्या व्यक्तीची संगत तुम्हाला प्रत्येक बाबतीत चांगले बनवते, तर वाईट संगत तुमच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनावर परिणाम करू शकते. कामाच्या ठिकाणापासून ते शेजारपर्यंत अशी अनेक माणसे आपल्याला भेटतात. यातील काही लोक आपल्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकांच्या आसपास राहिल्याने आपल्याला एक विचित्र प्रकारची नकारात्मकता येते. भांडखोर आणि हेवा करणारे लोक तुमची सकारात्मकता हिरावून घेतात. अशा व्यक्तीचा सहवास तुम्हालाही त्याच्यासारखा बनवू शकतो. जर तुमच्या आजूबाजूला अशीच हेवा करणारी लोक असतील तर तुम्ही त्यांच्याशी या मार्गांनी वागू शकता.


अशा लोकांना हाताळण्याचे मार्ग


ईर्ष्यावान लोक एक विचित्र प्रकारच्या नकारात्मकतेने भरलेले असतात. त्यांच्या सभोवताली राहून नकारात्मकता जाणवू लागते. अशा लोकांच्या सहवासात तुम्हीही त्यांच्या रंगात रंगून जाता, त्यामुळे अशा लोकांना ओळखणे आणि त्यांच्यापासून अंतर ठेवणे खूप गरजेचे आहे. तुमच्या आजूबाजूला अशी व्यक्ती असेल तर त्याच्याशी असा व्यवहार करा.



त्यांच्याशी विचारपूर्वक बोला


ईर्ष्यावान लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीवर चिडतात आणि या चिडचिडामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते, त्यामुळे अशा लोकांशी बोलताना काळजी घ्या. म्हणजे त्यांच्यासमोर विचारपूर्वक बोला. विशेषतः तुमच्या वैयक्तिक गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करू नका.



काहीही शेअर करू नका


जर तुम्ही पिकनिक, प्रमोशन किंवा प्रॉपर्टी घेण्याचा कोणताही प्लॅन बनवला असेल तर कृपया त्यांच्यासोबत अजिबात शेअर करू नका. ईर्षेपोटी ते तुमचा प्लॅन बिघडवण्याची पूर्ण शक्यता आहे.



सकारात्मक राहा


असे लोक बोलत असताना तुम्हाला चिडवण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांच्या वागण्याने स्वतःला प्रभावित होऊ देऊ नका. त्यांच्या नकारात्मकतेपासून स्वतःचे रक्षण करा आणि अशा लोकांशी सामना करण्यासाठी स्वतःला सकारात्मक ठेवणे खूप महत्वाचे आहे.


 


वाद टाळा


कोणत्याही विषयावर किंवा कृतीवरून वाद होण्याची शक्यता दिसली तर तेथून तोडून टाका. त्यांचा एकच उद्देश आहे की तुम्हाला चिथावणी देणे आणि तुम्हाला भांडायला लावणे. मत्सरी व्यक्तीचे काम समोरच्याला चिडवणे हे असते. परिस्थिती हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला शांत ठेवणे आणि तेथून दूर जाणे.


 


 


हेही वाचा>>>


Relationship Tips : जीवनात कोणाच्याही आधाराशिवाय आनंदी राहायचंय? या 5 गोष्टींचा अवलंब करा, कशाचीही गरज भासणार नाही


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )