Depression In Children :  सर्व मुलांची वागणूक वेगळी असते. मुलांसाठी (Children) रागावणे, वाईट वाटणे, विचित्र वागणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा हे दुःख आणि राग आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकतो, तेव्हा ही चिंताजनक गोष्ट असू शकते. जर मुलाला रागाने चिडचिड होत असेल आणि त्याचे वागणे बदलत असेल तर ते नैराश्य असू शकते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या अशा लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. 'लो मूड' म्हणजेच कमजोर मनःस्थिती आणि नैराश्य या अशा समस्या आहेत, ज्याचा मुलांनाही सामना करावा लागतो. या मुलांच्या नैराश्याचे कारण केवळ करिअर आणि घरातील ताणतणाव नसतात. त्यापेक्षा भावनिक सुरक्षिततेचा अभाव, पालकांकडून योग्य लक्ष न मिळणे किंवा शोषण अशी इतरही अनेक कारणे आहेत जी मुलांमध्ये नैराश्याचे कारण बनतात. 


प्रत्येक 7 पैकी एका भारतीय मुलाला 'ही' लक्षणे



तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 'डिप्रेशन इन चिल्ड्रन अँड एडोलेसेंट्स: अ रिव्ह्यू ऑफ इंडियन स्टडीज' या अहवालानुसार, प्रत्येक 7 पैकी एका भारतीय मुलाला मोटिवेशनचा अभाव, लो मूड आणि नैराश्याच्या सुरुवातीच्या लक्षणांनी ग्रासले आहे आहे. सर्वात वाईट गोष्ट अशी की, सुमारे 97 टक्के प्रकरणांमध्ये पालक याकडे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर, वागणुकीवर आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी 6 टक्के मुले आहेत. यापैकी, 13 ते 15 वर्षे वयोगटातील प्रत्येक 4 मुलांपैकी एक मूल तणावपूर्ण मनःस्थितीतून जात आहे. हे असे वय असते जेव्हा मूल जग, नातेसंबंध, समाज, स्वतःचे-परके, बरोबर-अयोग्य अशा गोष्टी शिकत असते. अशा परिस्थितीत नैराश्यामुळे त्याला योग्य मार्ग मिळाला नाही तर तो भरकटत जाऊ शकतो.



जर एखादे मूल नैराश्याचे बळी असेल तर पालकांना अनेक लक्षणे दिसू शकतात.


- तुमचे मूल गप्प राहिल्यास, उदासीन राहते. नेहमी गप्प राहते. गेल्या अनेक आठवड्यांपासून मूल नैराश्याने ग्रस्त असू शकते. जर मुल कोणत्याही गोष्टीवर सहज रडत असेल तर ते देखील नैराश्याचे लक्षण आहे.


-नैराश्याने ग्रासल्यामुळे, बरेचदा मुले स्वतःवर टीका करू लागतात. ते नेहमी इतर मुलांशी स्वतःची तुलना करून दोष आणि कमतरता शोधू लागतात. जसे- मी काहीही चांगले करू शकत नाही, माझे कोणतेही मित्र नाहीत, हे काम माझ्यासाठी कठीण आहे.


-अनेक वेळा नैराश्याने ग्रस्त असलेल्या मुलामध्ये ऊर्जा आणि प्रयत्नांची कमतरता दिसून येते. जर तुमचे मूल कोणतेही काम करण्यात रस दाखवत नसेल. जर तो शाळेच्या कामात पूर्वीसारखा भाग घेत नसेल, किंवा तितका प्रयत्न करत नसेल, त्याला सतत थकवा जाणवत असेल तर ते नैराश्य असू शकते. अशा परिस्थितीत मूल कोणतेही काम करण्याआधीच हार स्वीकारते.


-ज्या खेळांचा तो पूर्वी खूप आनंद घेत असे त्या खेळांमध्ये जर एखादा मुलगा रस घेत नसेल तर हे देखील नैराश्याचे लक्षण असू शकते. जर तो मित्रांसोबत कमी वेळ घालवत असेल तर तुम्हाला त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.


-जर मूल नैराश्यात असेल आणि जास्तीत जास्त वेळ एकट्याने घालवत असेल, गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर हे नैराश्याचे सर्वात मोठे लक्षण असू शकते. नैराश्याने ग्रस्त असलेल्या बहुतेक लोकांना शांततेत आणि एकटे वेळ घालवायला आवडते, त्यांना कोणासोबत राहणे आवडत नाही.



मुलांमध्ये नैराश्य का येते?


नैराश्याची कारणे बाह्य तसेच अंतर्गत असतात. अनेक आरोग्य समस्यांमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन देखील अशा प्रकारे होते की, व्यक्ती प्रथम चिंता आणि नंतर नैराश्याच्या आहारी जाते. अंतर्गत कारणांमध्ये जाणीवपूर्वक आणि चुकीची विचार पद्धती हे देखील नैराश्याचे एक कारण आहे. जेव्हा नकारात्मक विचार सतत येत राहतात, तेव्हा मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. बाह्य कारणांमध्ये सामाजिक-आर्थिक, दुर्लक्षित होणे, पालकांचे लक्ष न मिळणे, गुंडगिरीला बळी पडणे, शारीरिक, मानसिक किंवा भावनिक अत्याचार यांचा समावेश होतो.


 


मुलांमध्ये नैराश्याची लक्षणे


जलद वजन वाढणे किंवा जलद वजन कमी होणे
ऊर्जेचा अभाव आणि अधिक वेळ थकवा जाणवणे
निद्रानाश किंवा जास्त झोप येणे
आत्मविश्वासाचा अभाव 
काही चांगले घडले तरी आनंद वाटत नाही
रागाने वस्तू फेकणे
मोठ्याने ओरडणे
कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहणे
स्वतःला इजा करणे किंवा इतरांना दुखापत करणे
आत्महत्येचे विचार येणे किंवा त्याबद्दल बोलणे


मुलांना नैराश्यापासून कसे वाचवाल?


मुलाला प्रेमाने वागवा
प्रत्येक प्रसंगात तुम्ही त्याच्यासोबत आहात याची जाणीव मुलाला द्या
मुलाला वेळ द्या, त्याच्याशी बोला, खेळ खेळा किंवा त्याला एकत्र फिरायला घेऊन जा
तुमच्या मुलाच्या शिक्षकांना भेटा, त्याच्याबाबत फीडबॅक मिळवा
मुलाला चुकीची शिक्षा दिल्यानंतर आणि शिक्षा संपल्यानंतर त्याच्याशी प्रेमाने वागा
कोणत्याही चुकीसाठी मुलाला वारंवार शिव्या देऊ नका किंवा त्याला वाईट वाटू नका
जेव्हा मूल भावनिकदृष्ट्या कठीण परिस्थितीतून जात असेल तेव्हा त्याला धीर द्या आणि त्याला प्रेरणादायी गोष्टी सांगा.


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Winter Health Tips : हिवाळ्यात नाकातून पाणी येतं का? वेळीच सावध राहा; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात