Makar Sankranti 2022 : वर्षाच्या कॅलेंडरमधील पहिला सण म्हणून, सर्वजण मकर संक्रांतीची आतुरतेने वाट पाहत असतात. भारतातील विविधता लक्षात घेता, संक्रांतीचा उत्सव वैविध्यपूर्ण आहे आणि तो विविध प्रकारे साजरा केला जातो यात आश्चर्य नाही. हा सण साजरा करण्यामागे अध्यात्मिक कारणांसह सणाच्या उत्साह आणि चैतन्यमागे सखोल वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कारणेही आहेत.


मकर संक्रांतीत तिळाचे महत्त्व
तिळापासून बनवलेल्या मिठाईचे वाटप करण्यापूर्वी, ते एखाद्याच्या देवाच्या मूर्तीसमोर किंवा देवतेच्या फोटो समोर ठेवले जाते. हे मिठाईमध्ये शक्ती (दैवी ऊर्जा) आणि चैतन्य टिकवून ठेवण्यास मदत करते. पिण्याचे पाणी, आंघोळ, अंगावर तिळाचे तेल लावणे इत्यादी केल्यास पाप नाहीसे होते, असा समज आहे. तिळापासून बनवलेल्या मिठाईचे वाटप करताना आपल्यामध्ये भाव आणि चैतन्य जागृत होते.


वातावरणातील वाढलेल्या चैतन्यचा लाभ घरातील सर्व सदस्यांना मिळतो. लोकांमध्ये प्रेमभाव वाढतो आणि ते नकारात्मक विचारांवर मात करून त्याची जागा सकारात्मक विचाराने घेण्यास सक्षम होतात. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. अध्यात्मिकदृष्ट्या, तीळ आणि तिळाच्या तेलामध्ये सत्व शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता इतर कोणत्याही तेलापेक्षा अधिक असते.


तिळाच्या मिठाईचे महत्त्व म्हणजे तिळात जास्त प्रमाणात सत्त्वगुणांचे शोषण आणि उत्सर्जन करण्याची क्षमता असते. तिळाच्या मिठाईचे सेवन केल्याने आंतरिक शुद्धीकरण होते. या मिठाई एकमेकांना वाटून सात्त्विकतेची देवाणघेवाण होते, ज्यामुळे प्रत्येकाची सात्त्विकता वाढण्यास मदत होते.



महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha