Army Recruitment 2022 : सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लष्करातील रखडलेली भरती सरकार लवकरच पुन्हा सुरू करणार आहे. परंतु, यावेळी सरकार भरतीसाठी नव्या योजनेवर काम करत आहे. 'टूर ऑफ ड्युटी'च्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आली असून त्यामध्ये सैनिकांना केवळ चार वर्षे सैन्यात सेवा करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. 


सैन्य भरतीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला लष्करी व्यवहार विभाग सध्या सैन्यात भरतीसाठी एका नवीन योजनेवर काम करत आहे. लवकरच या आराखड्याचा मसुदा तयार करून देशाच्या सर्वोच्च नेतृत्वासमोर ठेवला जाण्याची शक्यता असून त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर लवकरात लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित केली जाईल. सैन्यातील ही नवीन भरती योजना 'अग्निपथ' या नावाने ओळखली जाऊ शकते. तर सैनिकांना 'अग्नवीर' असे नाव देण्यात येणार आहे. 


जगभरासह देशात देल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे अनेक सरकारी भरती थांबल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून सैन्यभरती देखील झालेली नाही. दरम्यान, संरक्षणराज्य मंत्री अजय भट्ट यांनी या वर्षाच्या सुरूवातीलाच संसदेत एका लेखी प्रश्नला उत्तर देताना कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती झालेली नाही अशी माहिती दिली होती. याबरोबरच सैन्यभरतीसह हवाई दल आणि नौदलांची भरती देखील थांबवण्यात आली आहे. परंतु, दोन वर्षांपासून सैन्य भरती थांबवण्यात आल्यामुळे भरतीची तयारी तरणाऱ्या तरूणांमध्ये संताप असून त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवडणूक रॅलीतही आपला विरोध व्यक्त केला आहे. याबरोबरच सोशल मीडियावर देखील  थांबवण्यात आलेली सैन्य भरती लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी तरूणांमधून करण्यात येत आहे. 


चार वर्षात होणार निवृत्ती 
नव्या योजनेनुसार ही सैन्य भरती चार वर्षांसाठी असणार आहे. चार वर्षांनंतर सैनिकांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही सैनिकांची सेवा वाढवली जाऊ शकते. तर बाकीचे सैनिक निवृत्त होतील. या चार वर्षांच्या नोकरीमध्ये सहा आणि नऊ महिन्यांचे प्रशिक्षण देखील असणार आहे. चार वर्षांच्या निवृत्तीनंतर या सैनिकांना पेन्शन मिळणार नाही. परंतु, एकरकमी रक्कम दिली जाईल, अशी माहिती आहे. 


कोणत्याही रेजिमेंटसाठी करता येणार अर्ज 
विशेष म्हणजे आता लष्कराच्या रेजिमेंटमध्ये जात, धर्म आणि प्रदेशानुसार भरती होणार नाही. तर ही भरती देशवासी म्हणून होई. म्हणजेच कोणत्याही जाती, धर्म आणि प्रदेशातील तरुण कोणत्याही रेजिमेंटसाठी अर्ज करू शकतात. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ही भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महत्वाच्या बामत्या 


ITBP Recruitment 2022 : आईटीबीपीमध्ये बंपर भरती, बारावी पास करा अर्ज 


ICG Jobs 2022: भारतीय तटरक्षक दलात 10वी पाससाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज