Saara Kahi Tichyasathi : सारं काही तुझ्यासाठी (Saara Kahi Tichyasathi) या मालिकेत दाईजींच्या मृत्यूनंतर मालिका सध्या रंजक वळणावर आहे. त्यातच  मेघना आणि चारूचे रचलेले कट यशस्वी होत आहेत.चारू श्रीनूला आपल्या जाळ्यात फसवण्यात यशस्वी झाली आहे. ती श्रीनू समोर रडून त्याच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करते. श्रीनू सोबत हे सगळं होत असतानां तिथे निशीची परिस्थिती देखील अवघड झाल्याचं पाहायला मिळतंय. 


पण निशी अचानक खोत घरात परतेत. त्यामुळे दादा खोतांना आणि उमाला देखील मोठा धक्का बसतो. निशी घाबरलेल्या अवस्थेत खोतांकडे येते. तिला कशाचच भान राहत  नाही आणि ती उमा आणि ओवीला सोडून कोणालाच ओळखतही नाही. निशीची अशी अवस्था पाहून सगळेच हादरतात. तेव्हा मेघना निशीच्या मागेमागे येते आणि सर्वांना निशी गरोदर असल्याचं सांगते. 


मेघनाचा डाव यशस्वी होणार


मेघना निशीच्या गरोदरपणाची बातमी देतानाही ती कोणाचच ऐकत नसून तिला तिच्या बाळाची नीट काळजी देखील घेता येत नसल्याचं सगळ्यांना सांगते. त्यातच मी तिला काही सांगितलं तर ती माझ्यावर अंगावर धावून येते. त्यातच मेघना चारुवर एक जबाबदारी सोपवते आणि तिला सांगते की निशीचं मिस कॅरेज कसं होईल अशी परिस्थिती निर्माण कर. 


उमा भक्कमपणे देणार निशीची साथ


दरम्यान निशीची अशी अवस्था पाहून उमा मात्र कणखर बनते आणि ती रघुनाथलाही भानावर आणते. एकुलती एक मुलगी आज दु:खात आहे, त्यामुळे आपल्याला तिला  सावरावं लागेल. तुम्हीच तिला लग्नाच्या वेळी वचन दिलं होतं की तुम्ही आयुष्यभर तिच्या पाठीशी उभे राहाल आता ते वचन  पाळायची वेळ आली आहे. त्यामुळे मेघना आणि चारुचा हा प्लॅन यशस्वी होणार का आणि त्यांचं सत्य उमा आणि रघुनाथच्या समोर येणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे निशी आणि श्रीनुच्या आयुष्यात आलेलं हे वादळ काय काय उध्वस्त करणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 


दरम्यान सारं काही तिच्यासाठी या मालिकेत खोतांच्या घरात फुट पडल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच दादा खोत आणि उमा घर सोडून गेल्यामुळे मंजू आणि लाली आत्यामध्येही बरंच वादळ तयार झालंय. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 


ही बातमी वाचा :


Amol Kolhe :  'आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा गाजवाल...', अमोल कोल्हेंच्या यशावर मराठी कलाविश्वातूनही उमटले अभिमानाचे सूर